नवी मुंबई : वाशीतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी भाजीपाल्याचे दर वधारले असून  शिमला मिरची, वांगी, फरसबी, काकडीच्या दरात १०% ते १५% वाढ झाली आहे. अवकाळी पाऊस आणि अतिउष्णतेमुळे भाज्यांचे उत्पादन कमी झाले असून दर वाढले आहेत, अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे. अवकाळी पाऊस आणि हवामानात होणारे बदल त्यामुळे उत्पादन कमी झाले असून भाज्यांच्या दर्जावर ही परिणाम झाला आहे. एपीएमसी बाजारात आवक कमी होत असून  उच्चतम प्रतीच्या भाज्यांचे दर वधारले आहेत.

 एपीएमसीत मंगळवारी ५९४ गाड्यांची आवक झाली असून यामध्ये शिमला मिरची, फरसबी, वांगी आणि काकडीची आवक घटल्याने दर १०% ते १५% वाढले आहेत,अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे.  मंगळवारी एपीएमसीत काकडी ३९२ क्विंटल आवक, शिमला मिरची १४८२ क्विंटल, फरसबी ७६ क्विंटल, वांगी  ३२३क्विंटल, वाटाणा १०४५क्विंटल, आवक झाली आहे.  टोमॅटो, गवार, भेंडी, कोबी, फ्लॉवर, गाजराचे दर स्थिर असून हिरवी मिरची,हिरवा वाटाणा दर उतरले आहेत, तर शिमला मिरची, वांगी, फरसबी, काकडीच्या दरांनी उसळी घेतली आहे.

soybean news in marathi
नोंदणी केलेल्या पाच हजार शेतकऱ्यांची सोयाबीन खरेदी अजूनही रखडली, शासनाकडे मुदत वाढवण्याची मागणी
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
pune vegetable prices marathi news
पुणे : आले, लसूण, काकडी, ढोबळी मिरची, मटारच्या दरात घट
parbhani cotton production loksatta news
करोना काळात परभणीत वाढलेला कापूस यंदा घटला
Dombivli Datta Nagar Fish Market news in update in marathi
डोंबिवलीतील दत्तनगरमधील मासळी बाजारामुळे वाहतूक कोंडी; मासळी बाजाराच्या स्थलांतराची नागरिकांची मागणी
soybean procurement target for 2024 25 has adjusted based on district responses
राज्यात सोयाबीन खरेदीमध्ये सहा जिल्ह्यांच्या उद्दिष्टांना कात्री
Nitrate levels in groundwater are increasing in seven districts of Maharashtra What are the risks print exp
महाराष्ट्रातील सात जिल्ह्यांत भूजलात नायट्रेटचे वाढते प्रमाण? कोणते धोके? 
low prices of tur in market
विश्लेषण : बाजारपेठेत तुरीच्या घसरणीमुळे शेतकऱ्यांशी कोंडी कशी?

हेही वाचा >>> नवी मुंबई: हापूस आवक घटल्याने दरवाढ; प्रतिपेटी २०० ते ५०० रुपयांनी महागले

आधी घाऊक बाजारात फरसबी प्रतिकिलो ४०-४५रुपयांनी उपलब्ध होती त्यामध्ये १० रुपयांची वाढ झाली असून आता ५०-५५ रुपयांनी विक्री होत आहे. प्रतिकिलो शिमला मिरची आधी २०-२२रु होती ती आता ३०-३२रुपयांनी विकली जात आहे. प्रतिकिलो काकडी १२-१४ रुपयांवरून १६-१८रुपये तर वांगी प्रतिकिलो १२रुपये होती आता १६ रुपयांनी विकली जात आहेत. एकंदरीत या भाज्यांची १०% ते १५% दरवाढ झाली आहे, तर हिरवी मिरची आणि मटारचे दर मात्र घसरले आहेत. आधी वाटाणा प्रतिकिलो ८० रुपये होता ते आता ६० रुपयांवर उपलब्ध आहे तर हिरवी मिरची १६-२० रुपयांनी विक्री होत आहे.

अवकाळी पाऊस आणि अतिउष्णतेने भाज्यांच्या उत्पादनाला फटका बसला असून दर्जावर ही परिणाम झाला . त्यामुळे एपीएमसी बाजारात काही भाज्यांची आवक कमी होत असून  दरवाढ झाली आहे.

– नाना बोरकर,व्यापारी, एपीएमसी

भाजी दर (प्रतिकिलो)

                           आता                आधी

काकडी              १६-१८रु            १२-१४रु

शिमला मिरची     ३०-३२रु            २०-२२रु

फरसबी               ५०-५५रु           ४०-४५रु

वांगी                    १६रु              १२रु

हिरवी मिरची         १६-२०रु        २०-३०रु

वाटाणा                 ६०रु            ८०रु

Story img Loader