ठाणे जिल्ह्यातील प्रमुख शहरांसाठी पाण्याचा प्रमुख स्रोत असलेल्या बारवी धरणातील वाढीव पाणी पुढील दीड वर्षे तरी मिळणार नाही. महाराष्ट्र औद्याोगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) या दोन्ही जिल्ह्यांतील स्थानिक स्वराज्य संस्थांना तसे कळवले आहे. बारवी पाणीपुरवठा विस्तारीकरण योजनेतील अनेक कामे सध्या सुरू आहेत. ही कामे पूर्ण नाहीत, तोवर वाढीव पाणी देता येणे शक्य नसल्याचे कळविण्यात आले आहे. तसा ठराव संचालक मंडळाच्या बैठकीत नुकताच झाल्याची माहिती वरिष्ठ प्रशासकीय सूत्रांनी ‘लोकसत्ता’ला दिली.

यंदाच्या वर्षी जुलै आणि सप्टेंबर महिन्यात पाऊस झाला. त्यामुळे शहरांना २०२४च्या आरंभीच पाणीकपातीला सामोरे जाण्याची वेळ येऊ शकते. जिल्ह्यातील मोठ्या शहरांना पाणीपुरवठा करण्यासाठी ‘एमएमआरडीए’ने सूर्या धरण पाणी योजनेच्या वेगवेगळ्या टप्प्यांना वेग दिला आहे. ठाणे जिल्ह्याला सर्वाधिक पाणी देऊ शकेल, अशा काळू धरणाच्या उभारणीसह इतर अनेक प्रकल्प अजूनही कागदावर आहेत. त्यामुळे भविष्यात पाण्याचे नवे स्रोत अद्याप हाती लागलेले नाहीत.

municipal commissioner bhushan gagrani inspected Sewage treatment center progress near sea setun bandra west
वांद्रयातील मलजल प्रक्रिया केंद्र जुलै २०२७ पर्यंत केंद्र कार्यान्वित करणार, मलजल प्रक्रिया केंद्राच्या कामांची पालिका आयुक्तांनी केली पाहणी
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Mumbais Water for All policy provided 7868 new water connections by December 2024
सर्वांसाठी पाणी धोरणाअंतर्गत १५ हजार अर्ज, ७८६८ जोडण्या दिल्या
When will daily water supply be provided to Pimpri-Chinchwad
पिंपरी-चिंचवडला दररोज पाणीपुरवठा कधी होणार? आयुक्तांची महत्वाची माहिती
water supply cut in mumbai news
मुंबईत बुधवारी, गुरुवारी पाणीपुरवठा बंद
vasai virar municipal corporation Planning of development plan according to 10 sectors
विकास आराखड्याचे १० विभागानुसार नियोजन, आरक्षित भूखंडावर अतिक्रमणाबाबत महापालिकेचे मौन
Kulgaon Badlapur municipal news in marathi
वृत्तपत्र विक्रेत्यांवर कारवाई होणार नाही; बदलापूर मुख्याधिकाऱ्यांचे आश्वासन, प्रेस क्लब ऑफ बदलापुरच्या मागणीला यश
17 percent water loss from 65 major irrigation projects in Maharashtra state
धरणांमधील १७ टक्के पाणी वाया! कालव्यांची दुरवस्था, बाष्पीभवनाच्या वाढत्या वेगाचा परिणाम

हेही वाचा – जुन्या आनंद आश्रमाच्या आठवणीत सगळेच रमले

चार वर्षांपूर्वी जिल्ह्यातील एमआयडीसीच्या बारवी धरणाच्या विस्तारीकरणाचा तिसरा टप्पा पूर्ण झाला. त्यामुळे धरणाची क्षमता ३४० दशलक्ष घनमीटर इतकी झाली. धरणाची उंची वाढल्याने ठाणे जिल्ह्यातील सर्वच महापालिकांनी बारवी धरणातून वाढीव पाण्याचा साठा मंजूर व्हावा, असा आग्रह धरला आहे. धरणाची उंची वाढवल्यानंतर त्यामुळे प्रकल्पग्रस्त झालेल्या ६८ पैकी ६२ जणांना नवी मुंबई महापालिकेत सामावून घेण्यात आले. त्याबदल्यात नवी मुंबई महापालिकेला बारवी धरणातून २५ एमएलडी पाणी एमआयडीसीमार्फत मिळणे अपेक्षित होते. परंतु,ते ठरलेल्या प्रमाणापेक्षा कमी दिले जात आहे. त्यामुळे ऐरोली, घणसोली येथील नागरिकांना पाण्याचा तुटवडा भासत आहे.

हेही वाचा – ‘आनंद दिघे साहेबांचा हंटर कुठेय’, मुख्यमंत्र्यांनी विचारले निर्मात्यांना, जुन्या आनंद आश्रमाच्या आठवणीत मुख्यमंत्र्यांसह सगळेच झाले रममाण

पुरवठा यंत्रणा

  • ७५१.११

कोटी नक्त प्रकारातील कामे

  • ८६३.७८

कोटी ठोक कामे हाती

बारवी धरणातून विसर्ग केलेले पाणी बारवी नदीत सोडले जाते. बारवी नदी उल्हास नदीस जांभूळ गावाजवळ मिळते. या नद्यांच्या संगमाच्या खालील बाजूस अशुद्ध पाणी नदी पात्रातून उचलण्याकरिता बंधारा बांधून अडवले आहे. अडविलेले पाणी उल्हास नदीच्या किनाऱ्यावर मौजे वसत येथे बांधलेल्या जल उदंचन केंद्राद्वारे उचलून जलवाहिन्याद्वारे जांभूळ येथे स्थापन केलेल्या बारवी जलशुद्धीकरण केंद्रात पाठविले जाते. पुढे महामंडळाच्या अंबरनाथ, बदलापूर, अतिरिक्त अंबरनाथ, तळोजा, डोंबिवली, टीटीसी, वागळे इस्टेट आणि ठाणे या औद्याोगिक वसाहतींना आणि त्यांच्या आजूबाजूला असलेल्या नवी मुंबई, ठाणे, डोंबिवली, उल्हासनगर, सिडको, म्हाडा वसाहती, अंबरनाथ आणि मीरा-भाईंदर या शहरांना हे पाणी पुरविण्यात येते.

Story img Loader