उरण : खारकोपर ते उरण ही बहुप्रतिक्षित लोकल सुरू होऊन अवघे सहा महिने झाले असून गुरुवारी झालेल्या जोरदार पावसामुळे उरणच्या स्थानकाच्या भुयारी मार्गात पाणीच पाणी झाले आहे. त्यामुळे हजारो प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. गतवर्षी अशाच प्रकारे पाणी साचले असतांना रेल्वेने पाणी उपसासाठी पंप लावूनही ही स्थिती निर्माण झाली आहे. मागील वर्षी उरण आणि द्रोणागिरी(बोकडवीरा) या दोन्ही स्थानकात पाणी साचल्याने लोकल सुरू होण्यापूर्वीच या मार्गावरील स्थानकांच्या कामांची पोलखोल झाली होती.

उरण लोकल सुरू होण्याची येथील नागरीक वाट पाहत आहेत. त्यातच यासाठी तारीख पे तारीख ही जाहीर झाल्यानंतर १२ जानेवारीला पंतप्रधानांच्या हस्ते या लोकल मार्गाचे उदघाटन झाले आहे. त्याचवेळी पहिल्याच पावसात नव्याने उभारण्यात आलेल्या स्थानकांत चार ते पाच फूट पाणी साचल्याने पावसाळ्यात या स्थानकांची स्थिती काय असणार याचे भविष्यच दिसू लागले होते.

navi mumbai cracks on flyover
नवी मुंबई: २६ वर्षांत उड्डाण पुलाला तडे, वाहतूक बंद 
Bees attacked on women who had gone for vatpaurnima in Nive village of Poladpur taluka
रायगडात वटपूजन करताना अघटित घडले… जाणून घ्या काय आहे प्रकार…
Wrong Signal Wadala Station
मुंबई : स्टेशन मास्तरचा चुकीचा सिग्नल अन् गोरेगावला जाणारी लोकल वाशीला निघाली, पुढे काय झालं?
navi mumbai crime news
नवी मुंबई: माझ्या मुलाला न्याय द्या, आईची आर्जवी मागणी; मात्र शाळा प्रशासन, पोलीस आणि रुग्णालय उदासीन 
cidco to sale island adjacent to palm beach road in navi mumbai for residential complexes
पाणथळींपाठोपाठ नवी मुंबईतील बेटावर निवासी संकुले!
Panvel Demolition Video
“हरले म्हणून गरिबाला त्रास..”,पनवेलमध्ये झालेल्या कारवाईचा संबंध योगी आदित्यनाथ यांच्याशी का जोडला जातोय? पाहा Video
Mumbai local 24 years ago old video goes viral
मुंबई लोकलमध्ये २५ वर्षांपूर्वी किती गर्दी असायची? सोशल मीडियावर व्हायरल झालेला Video पाहाच
Police found dead body of a man in lake but shocked as he suddenly start speaking shocking video
VIDEO: हे कसं झालं? ८ तास तलावात पडलेला ‘मृतदेह’; पोलिसांनी बाहेर खेचताच अचानक उठून बोलू लागला

हेही वाचा : पनवेलमध्ये १ मेट्रीक टन प्लास्टिक पिशव्यांचा साठा जप्त

उरण व द्रोणागिरी दोन्ही स्थानकातील प्रवाशांच्या जीवाला धोका त्यातच पावसाळ्यात या दोन्ही स्थानकात पाणी साचल्याने या स्थानकातील विद्युत प्रवाहावर परिणाम होत आहे. त्यामुळे उरण व द्रोणागिरी ही दोन्ही स्थानके अंधारात जात आहेत. यावेळी प्रवाशांना याचा फटका बसण्याचा धोका निर्माण झाला आहे.