रानसई धरणाचे पाणी कमी पडत असल्याने नोव्हेंबर मध्येच पाणी कपातीची वेळ

उरण : तालुक्यातील नागरी वसाहत व औद्योगिक विभागला पाणी पुरवठा करणाऱ्या रानसई धरणातील पाण्याची साठवणूक क्षमता कमी झाल्याने महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळ(एम आय डी सी) ने उरण मध्ये मंगळवार व शुक्रवार आशा दोन दिवसांच्या पाणी कापतीला सुरुवात केली आहे. तसेच पाणी जपून वापरण्याचेही आवाहन केले आहे. यामुळे उरणच्या नागरिकांच्या अडचणीत वाढ होणार आहे.

Mumbai corporation 540 crore cleaning drains monsoon
नाल्यांच्या सफाईसाठी ५४० कोटींचा खर्च अपेक्षित
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Mumbai water supply cut
भांडूप, कुर्ला, अंधेरी, जोगेश्वरी ते वांद्रे परिसरातील पाणीपुरवठा बुधवारी बंद, ३० तासांसाठी पाणीपुरवठा बंद
pune water bill marathi news
पुणे : पुरवठ्या आधीच समाविष्ट गावांच्या पाणीपट्टीत वाढ ?
pune Municipal Corporation, water ,
‘त्या’ गावातील ११ सोसायट्यांना टँकरने पाणी, काय आहे कारण ?
Nitrate levels in groundwater are increasing in seven districts of Maharashtra What are the risks print exp
महाराष्ट्रातील सात जिल्ह्यांत भूजलात नायट्रेटचे वाढते प्रमाण? कोणते धोके? 
Pune Municipal Corporation has decided to make it mandatory for tanker drivers to obtain license
पाणी नक्की कुठून घेतले, कुठे दिले हे सांगावे लागणार!
Khadakwasla, Kirkatwadi water purification, pune health department
खडकवासला, किरकिटवाडीला शुद्धीकरणाविनाच पाणी !

उरण तालुक्याची लोकसंख्या नागरीकरणामुळे वाढू लागली आहे. त्यामुळे उरणला अधिकच्या पाण्याची गरज आहे. मात्र उरण मधील २३ ग्रामपंचायती तसेच नगरपरिषदेला ही येथील रानसई धरणातून पाणी पुरवठा केला जात आहे. मात्र रानसई धरण ६० वर्षांपूर्वी उभारण्यात आले आहे. त्यावेळी या धरणाची क्षमता १० लाख दशलक्ष घनमीटर होती. या धरणात मागील ६० वर्षात मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. या गाळा मुळे धरणाची पाणी साठवणूक क्षमता कमी होऊन ७ दशलक्ष घनमीटर वर आली आहे. एकीकडे पाण्याची मागणी वाढली असतांना पाणी साठा कमी झाला आहे. त्यामुळे एम आय डी सी ला पाणी पुरवठा कऱण्यासाठी सिडकोच्या हेटवणे धरणातून दररोज चे दहा एम एल डी पाणी उसने घ्यावे लागत आहे. मात्र सिडको कडून ही दररोज पुरेसा पाणी पुरवठा होत नसल्याने पाणी कपात करावी लागत आहे.

रानसई धरणातील पाणी साठा वाढविण्यासाठी धरणाची उंची वाढविण्याची गरज आहे. मात्र हा उंचीचा प्रस्ताव दहा वर्षांपासून गुलदस्त्यात आहे. मात्र त्यामुळे उरणच्या नागरिकांना उसने पाणी व नोव्हेंबर पासूनच कपातीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे उरण मधील नागरिकांमध्ये असंतोष आहे. रानसई धरणातील पावसाचे पाणी थांबल्याने धरणाची पाणी पातळी कमी होण्याची शक्यता असल्याने वर्षभर पाणी पुरवठा करण्यासाठी ही पाणी कपात केली जात असल्याची माहिती उरण एम आय डी सी चे उपअभियंता रवींद्र चौधरी यांनी दिली आहे.

Story img Loader