नवी मुंबई : मुंबईचे प्रवेशद्वार असलेल्या वाशी टोल नाक्याजवळ खाडीवर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे सुरू असलेल्या तिसऱ्या खाडी पुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. सध्या पुलाच्या दोन्ही बाजूला उभारण्यात येत असलेल्या प्रत्येकी तीन मार्गिकांच्या दोन पुलांपैकी मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या पुलाचे काम अंतिम टप्प्यात आहे. यामुळे मुंबईहून पुण्याकडे मोठ्या संख्येने जाणाऱ्या वाहनचालकांना वाहनकोंडीतून मोठा दिलासा मिळणार आहे.

मार्च २०२४ पर्यंत मुंबईकडून पुण्याकडे जाणारा उड्डाणपुल नागरिकांसाठी खुला करण्याचे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे लक्ष्य होते. परंतु अनेक अडचणी तसेच आचारसंहितेमुळे प्रशासकीय अडचणी यामुळे कामाला विलंब लागला असून आता वेगाने काम करण्यात आले आहे.

navi mumbai cracks on flyover
नवी मुंबई: २६ वर्षांत उड्डाण पुलाला तडे, वाहतूक बंद 
Bees attacked on women who had gone for vatpaurnima in Nive village of Poladpur taluka
रायगडात वटपूजन करताना अघटित घडले… जाणून घ्या काय आहे प्रकार…
Young girl photoshoot on dam and she fell in dam water shocking video
VIDEO: जीव एवढा स्वस्त असतो का? रीलच्या नादात होत्याचं नव्हतं झालं; पाण्याच्या प्रवाहात तरुणी क्षणात दिसेनाशी झाली
video having fun with the kids under the waterfall suddenly the water level rose and the picture changed shocking video goes viral
लोणावळ्याची घटना ताजी असतानाच आणखी एक VIDEO समोर; काही सेंकदांत घेतलेल्या निर्णयामुळे असा बचावला चिमुकला
Panvel Demolition Video
“हरले म्हणून गरिबाला त्रास..”,पनवेलमध्ये झालेल्या कारवाईचा संबंध योगी आदित्यनाथ यांच्याशी का जोडला जातोय? पाहा Video
Indian Team Parade Viral Photos
टीम इंडियाच्या स्वागतासाठी उसळलेला जनसागर पाहून आनंद महिंद्रांनी मरीन ड्राईव्हला दिले नवे नाव; सूर्यकुमार म्हणाला, “तुम्ही…”
nilesh lanke sharad pawar
“निलेश लंकेंना संसदेत पाहून लोक विचारतील, हा कोण…”, शरद पवारांचं वक्तव्य; म्हणाले, “ते मराठीत काय बोलतील…”
rumor, Vishal Agarwal absconding, pimpri chinchwad police, porsche car accident
विशाल अगरवाल पोलिसांच्या ताब्यातून फरार? पिंपरी चिंचवड पोलिसांनी केला खूलासा…

हेही वाचा…नवी मुंबई: कांदा बटाटा बाजारातील व्यापाऱ्यांसाठी पर्यायी जागा उपलब्ध

दोन्ही जुन्या पुलांच्या मध्ये मुंबईकडून वाशीकडे येणारा पुलाचे काम वेगात सुरू आहे. याच मुंबईहून पु्ण्याच्या दिशेच्या मार्गावर ही ३ पदरी उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात आहे. पुण्याकडे जाणाऱ्या पुलाचे काम जवळजवळ पूर्णत्वास आले आहे. त्यामुळे याच उड्डाणपुलावर संबंधित काम करत असलेल्या एल अॅण्ड टी कंपनीने लक्ष केंद्रीत केले आहे.

हेही वाचा…दिल्ली-मुंबई १२ तासांचे स्वप्न भंगणार, बडोदा-मुंबई महामार्गाचे काम सरासरी ४५ टक्के पुर्ण परंतू विरार अलिबागचे भूसंपादन अवघे २२ टक्केच

५९८ कोटी खर्च

शासनाने या ठिकाणी सध्या असलेल्या पुलांच्या दोन्ही दिशेला प्रत्येकी तीन पदरी दोन उड्डाणपुल आकारास येत आहेत. यासाठी ५९८ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. याबाबत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक राजेश पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद मिळाला नाही.