– डॉ. यश वेलणकर

सजीव शरीरातील गतिमान संतुलन हे आरोग्याचे निदर्शक आहे. शरीराचे तापमान, रक्तातील साखरेचे प्रमाण, पाण्याचे प्रमाण अशा अनेक गोष्टी स्थिर नसतात; त्या ठरावीक मर्यादेत कमी-जास्त होत असतात. ही मर्यादा ओलांडली की आरोग्य बिघडते. शरीरातील समतोल बिघडल्यानेच असे होते. कोणत्याही बाह्य़ किंवा आंतरिक कारणांनी हा समतोल बिघडू लागल्यानंतर तो लवकरात लवकर दुरुस्त करून पुन्हा संतुलन साधण्याच्या क्षमतेवर आरोग्य अवलंबून असते. व्यायाम, योगासने आणि प्राणायाम यामुळे ही क्षमता विकसित होते. त्यामुळे या कृती आरोग्यासाठी लाभदायक आहेत.

How to make paratha
प्रत्येक वेळी पराठे लाटताना फुटतात? मग ट्राय करून बघा ‘या’ टिप्स…
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
do you have sinus and breathing problems
Video : तुम्हाला सायनस किंवा श्वसनाशी संबंधित त्रास होतो? भस्त्रिका प्राणायाम करा, जाणून घ्या कसे करावे?
Shankaracharya Abhinav Shankar Bharti statement that meat consumption is permitted in religious rituals
लोक लौकिक: योग आणि भोग, की दोन्हीही?
Vidyut Jammwal
Vidyut Jammwal : “दररोज पाच मिनिटे श्वासोच्छ्वासाचा व्यायाम करणे हे १० किलोमीटर धावण्याइतके फायदेशीर” अभिनेता विद्युत जामवालचा दावा; जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात
Once you find yourself, then the energy, the joy, the energy to live will continue to make you happy forever.
अन् मी मला सापडले…
Manoj Pahwa shared fitness journey
Fitness Story : मनोज पाहवाने फिटनेस ट्रेनरला लावले पळवून; वजन कमी करताना तुमचीही अशीच परिस्थिती असेल, तर वाचा, तज्ज्ञांचे मत
what happens when you keep a pillow between your legs while sleeping
तुम्ही देखील झोपताना पायामध्ये उशी ठेवता का? ‘ही’ झोपण्याची योग्य पद्धत आहे का? तज्ज्ञांनी केला खुलासा…

योगासने करताना शरीराला वेगवेगळ्या स्थितींत नेले जाते. अर्धमत्स्येन्द्रासनात पाठीच्या कण्याला पीळ देतो किंवा शीर्षांसनात उलटे होतो, तेव्हा शरीराचे संतुलन बिघडते. पण त्यानंतर थोडा वेळ विश्रांती घेतो तेव्हा शरीर पुन्हा संतुलन साधते. प्राणायामातील कपालभाती किंवा उड्डीयान बंध केल्यानेही संतुलन बिघडते आणि शरीर पुन्हा तो साधते. या क्रियांच्या सरावामुळे संतुलन बिघडल्यानंतर पुन्हा समतोल साधण्याची शरीराची क्षमता विकसित होते, शरीराला तेच प्रशिक्षण दिले जाते. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते, तापमानातील बदल सहन करण्याची क्षमता वाढते. हे जसे शरीरात होते, तसेच मनाच्या आरोग्यासाठीही आवश्यक आहे, असे मेंदूविषयक संशोधकांना वाटते. म्हणजे कोणत्याच आव्हानाला कधीही सामोरे न गेलेल्या माणसाला साधेसे संकटही नामोहरम करते; कारण त्याच्या मेंदूला समतोल साधण्याचे प्रशिक्षण मिळालेले नसते. अतिशय स्वच्छ आणि निर्जंतुक वातावरणात राहिलेल्या माणसाची रोगप्रतिकारशक्ती अतिशय दुबळी होते.

अगदी तसेच सतत सुरक्षित वातावरणात वाढलेल्या माणसाच्या मेंदूचेही होते. त्यामुळे थोडय़ाशा अपयशाने औदासीन्य येते, संकटाच्या विचारांनीच चिंतारोग होतो. अशा वेळी मेंदू त्याच्या परीने संतुलन साधण्याचे स्वत:ला प्रशिक्षण देऊ इच्छित असतो. दर्दभरी गाणी ऐकणे हे अशा प्रकारचे एक प्रशिक्षण आहे. ती ऐकल्याने मेंदूत दु:खप्रसंगी होणारे बदल होतात, पण ते कायम राहत नाहीत. मेंदूतील स्थिती बदलते; पण मेंदूला संतुलन साधण्याचे प्रशिक्षण मिळते. शीर्षांसन केल्याने जे शरीरात होते, तेच दर्दभरी, विरह गीते ऐकल्याने मेंदूत होते. त्याचमुळे दु:ख ही भावना त्रासदायक असली, तरी ती भावना निर्माण करणारी गाणी ऐकावी असे वाटते. अशी गाणी ऐकताना शरीरातील संवेदनांकडे लक्ष ठेवले आणि त्यांचा साक्षीभाव ठेवून स्वीकार केला, तर त्याचा लाभ अधिक होतो.

yashwel@gmail.com

Story img Loader