– डॉ. यश वेलणकर

आधुनिक काळात मुले अधिक स्मार्ट आहेत पण ती आत्मकेंद्री होत आहेत असे जगभरातील शिक्षणतज्ज्ञांना वाटते. त्याचमुळे इतरांशी जुळवून घ्यायला शिकणे हा शिक्षणाचा एक उद्देश असावा हे युनिसेफने मान्य केले आहे. ध्यानामुळे विद्यार्थ्यांना वाचलेले किंवा ऐकलेले पटकन समजते. म्हणजेच ज्ञानसंपादन अधिक सक्षमतेने होते. एक महिना ध्यानाचा सराव केल्याने विद्यार्थी अभ्यासावर लक्ष अधिक चांगले देऊ शकतात, त्यांच्या मनात येणारे इतर विचार त्यांना बेचैन करीत नाहीत. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात माहितीचा महास्फोट होत असल्याने लक्ष केंद्रित करण्याच्या कौशल्याचे महत्त्व अधिकच वाढले आहे. त्याचबरोबर विचार जुळत नाहीत म्हणून संबंध तोडणारी माणसे जगभर वाढत आहेत. वैवाहिक आणि व्यावसायिक समस्या त्यामुळे वाढतात आणि अनेक माणसे औदासीन्याची शिकार होतात. काही मतभेद असले तरी दुसऱ्या व्यक्तीच्या भावना समजून घेऊन अनेकांशी समन्वय साधण्याची क्षमता यशस्वी आणि आनंदी आयुष्यासाठी महत्त्वाची असते, ती ध्यानाच्या सरावाने वाढते असे दिसत आहे. एका निरीक्षणानुसार, साक्षीध्यानाचा नियमित सराव करणारे विद्यार्थी राग, चिंता, नैराश्य अशा विघातक भावनांमध्ये अधिक काळ अडकून पडत नाहीत. त्यामुळे भांडण झाले तरी कटुता फार काळ राहात नाही. ध्यानाने केवळ नकारात्मक भावना कमी होतात असे नसून आनंद, कृतज्ञता, समाधान आणि समन्वय अशा सकारात्मक भावना वाढतात असेही संशोधनात दिसत आहे. साक्षीध्यानाच्या दहा आठवडय़ांच्या अभ्यासाने सजगता जेवढी अधिक वाढते तेवढीच समानुभूती (एम्पथी) देखील वाढते का हे पाहण्यासाठी शास्त्रज्ञांनी एक वर्ष नियमितपणे ध्यान करणारे काही विद्यार्थी निवडले आणि तेवढय़ाच नवीन विद्यार्थ्यांना हे ध्यान शिकवले. या दोन्ही गटांच्या विद्यार्थ्यांच्या मेंदूचा फंक्शनल एमआरआय ते ध्यानावस्थेत असताना केला. ते ध्यान करीत असताना दोन्ही गटांच्या विद्यार्थ्यांना रडण्याचे आवाज ऐकवले. त्या वेळी नियमित ध्यानाचा सराव करणाऱ्या मुलांच्या मेंदूतील इन्सुला नावाचा भाग अधिक सक्रिय झाला. हा भाग दुसऱ्यांच्या भावना जाणण्यासाठी आवश्यक असतो.

activists stage sit-in protest over removal of unauthorized statue of dr ambedkar
डॉ. आंबेडकरांचा विनापरवाना बसविलेला पुतळा हटवल्याने कार्यकर्त्यांचे ठिय्या आंदोलन
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Myra Vaikul Upcoming Movie Mukkam Post Devach Ghar review
छोट्यांची मोठी गोष्ट
Gen Z and the Lost Art of Conversation
तब्बल पाच हजार वर्षांचा इतिहास असलेला थेट मानवी संवाद हरवतोय? नेमके काय घडते आहे?
The quality of school students has deteriorated it is clear from the asar survey Mumbai news
शालेय विद्यार्थ्यांची गुणवत्ता खालावलेलीच! ‘असर’च्या अहवालात शैक्षणिक अधोगतीचा पंचनामा
Father Disappointed After Seeing Daughters English In Whatsapp Chat Viral on social media
PHOTO: वडिलांनी मुलीला ४० हजार पाठवल्याचा मेसेज केला; यावर मुलीचा रिप्लाय पाहून वडिल झाले शॉक; व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल
Marathi actress Tejashri Pradhan talk about social media
“फक्त हे मृगजळासारखं…”, सोशल मीडियाबाबत तेजश्री प्रधानने मांडलं मत; तरुणपिढीला सल्ला देत म्हणाली, “आपण आयुष्यात…”
Vishwas Nangare Patil told amazing poem of Suresh Bhat
Video : “कधीही हरल्यासारखे वाटेल तेव्हा हे ऐका” विश्वास नांगरे पाटील यांनी सादर केली सुरेश भटांची ही अप्रतिम कविता

याचाच अर्थ ध्यानाच्या नियमित सरावाने समानुभूतीची क्षमता वाढते. घरात आणि नोकरीत समानुभूती असेल तर जुळवून घेणे शक्य होते आणि वादविवाद कमी होतात. ही क्षमता ध्यानाने वाढत असल्याने परदेशांतील शाळा-कॉलेजात ध्यानाचा उपयोग नियमितपणे होऊ लागला आहे.

yashwel@gmail.com

Story img Loader