– डॉ. यश वेलणकर

माणसाला होणारे अनेक शारीरिक आजार मानसिक तणावामुळे होतात. मधुमेह, हृदयविकार, अर्धशिशी, आम्लपित्त, तोंडात/आतडय़ात जखमा, सततचा थकवा, हायपरटेन्शन, थायरॉइडचे विकार.. अशा अनेक आजारांचे मूळ कारण मानसिक तणाव हे असू शकते. मात्र, असा आजार असलेल्या व्यक्ती त्यांच्यावर कोणताही तणाव नसल्याचे सांगतात. समुपदेशन करताना त्यांना त्यांच्या भूतकाळात घडून गेलेल्या त्रासदायक प्रसंगाविषयी बोलते केले, की असे काहीना काही प्रसंग त्यांना आठवतात. प्रेमभंग, अपघात, परीक्षेतील अपयश, मारहाण, दंगा, जाळपोळ, मृत्यू असे काहीना काही घडलेले असते. पण- ‘त्याचा आता कोणताही तणाव नाही, मी त्यामधून बाहेर पडलो आहे,’ असे ती व्यक्ती सांगत असते. ते खरेही असते. हा शारीरिक आजार सोडला, तर त्या व्यक्तीला कोणताही मानसिक त्रास नसतो. ती तिच्या यशस्वी आयुष्यात सुखी असते.

activists stage sit-in protest over removal of unauthorized statue of dr ambedkar
डॉ. आंबेडकरांचा विनापरवाना बसविलेला पुतळा हटवल्याने कार्यकर्त्यांचे ठिय्या आंदोलन
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Myra Vaikul Upcoming Movie Mukkam Post Devach Ghar review
छोट्यांची मोठी गोष्ट
zee marathi new serial promo tula japanar ahe promo announces
तारीख अन् मुहूर्त ठरला! ‘झी मराठी’ची थ्रिलर मालिका ‘या’ दिवशी सुरू होणार; संपूर्ण स्टारकास्ट आली समोर, पाहा जबरदस्त प्रोमो
Honaji Tarun Mandal celebrating its centenary silver jubilee unveiled new statue of Ganesh Destroyer this year
होनाजी तरुण मंडळाची नवी ‘संहारक गणेश मूर्ती’ गणेश जयंतीला प्रतिष्ठापना
Guillain Barre Syndrome , Sinhagad Road Area,
संशयित रुग्णांचे तातडीने फेरसर्वेक्षणाचे केंद्रीय उच्चस्तरीय पथकाचे निर्देश! जाणून घ्या नेमकं काय घडलं…
The quality of school students has deteriorated it is clear from the asar survey Mumbai news
शालेय विद्यार्थ्यांची गुणवत्ता खालावलेलीच! ‘असर’च्या अहवालात शैक्षणिक अधोगतीचा पंचनामा
Yashomati Thakur warned that distributing trishuls could lead to violence and threaten law and order
अमरावती जिल्ह्यात काही संघटनाकडून शस्त्रांचे वाटप, यशोमती ठाकूर यांचा आरोप

असा आजार असलेल्या व्यक्तींकडून सत्त्वावजय चिकित्सेत विशिष्ट ध्यान करून घेतले जाते. शरीरातील संवेदना जाणून त्यांचा स्वीकार करण्याचा साक्षीध्यानाचा सराव किमान दोन महिने झाल्यानंतर हे कल्पनादर्शन ध्यान करून घेतले जाते. त्यामध्ये भूतकाळातील प्रसंग आत्ता घडतो आहे अशी कल्पना करून तो पाहायला प्रेरित केले जाते. असे ध्यान ती व्यक्ती करू लागली, की तिला शरीरावर लक्ष न्यायला सुचवले जाते. अशा वेळी तिला छातीवर किंवा डोक्यात भार, धडधड, पोटात गोळा किंवा रडू येणे अशा संवेदना जाणवू लागतात. त्या कुठे आहेत, हे उत्सुकतेने पाहण्याची आठवण केली जाते. काही वेळा या संवेदना खूप त्रासदायक असू शकतात. त्या स्वीकारापलीकडे असतील, तर दीर्घ श्वसनाने त्यांची तीव्रता कमी होते.

तणाव नाही असे आपण म्हणत असलो, तरी आपल्या शरीरमनात या घटनांचा परिणाम साठवलेला आहे, हे त्या व्यक्तीच्या लक्षात येते. मानसिकदृष्टय़ा त्या आघातावर मात केलेली असली, तरी सुप्त मनात त्या जखमा राहिलेल्या असतात. त्यामुळे शरीरात युद्धस्थितीतील रसायने पाझरत राहतात. त्यांच्यामुळे शरीरात बदल होत असले, तरी संवेदनांकडे लक्ष देण्याचे ध्यान केलेले नसल्याने त्या संवेदना जागृत मनाला जाणवत नाहीत. मात्र त्या रसायनांमुळे शरीरात जे बदल होतात, त्यातील एखादा बदल आजार म्हणून व्यक्त होतो. वरील ध्यानाने शरीरमनात साठलेला कचरा स्वच्छ होऊन शारीरिक आजाराचा त्रास कमी होऊ शकतो.

yashwel@gmail.com

Story img Loader