-डॉ. माधवी वैद्य  madhavivaidya@ymail.com

वाक्प्रचार, म्हणी, सुभाषिते, अलंकार ही आपल्या भाषेची अलंकारलेणी आहेत, ज्यामुळे  मराठी भाषेला सौंदर्य प्राप्त होते. भाषा अधिक अमृतमयी, दळदार पद्धतीने सादर होते. आधीचा मराठी भाषेचा गोडवा हजार पटीनी द्विगुणित होतो.

shahu Patole author of dalit Kitchen of maharashtra remarked bans on animal killings like cows and potentially donkeys wouldnt be surprising in future
भविष्यात पशु-पक्ष्यांच्या हत्येवरही बंदी आल्यास आश्चर्य वाटणार नाही, असे का म्हणाले लेखक शाहू पाटोळे
Best Vegetables for Vegetarians and Non-vegetarians
Vegetables for Nonvegetarians ‘ही’ भाजी मांसाहार करणाऱ्यांकरता आवश्यक…;…
pandit hridaynath Mangeshkar
हृदयनाथ मंगेशकर आकाशवाणीच्या नोकरीत खरंच होते का? कधी?
Preservation of rare books benefits literature lovers Pune Nagar Vachan Mandir
दुर्मीळ पुस्तकांच्या जतनाचा साहित्यप्रेमींना लाभ, पुणे नगर वाचन मंदिराचा उद्या वर्धापनदिन
Nagpur 3rd grad student Kashish Thakur sang poem earning appreciation from Bhuse during inspection
जेव्हा शिक्षण मंत्र्यांना चिमूकलीने ऐकवली कविता…
Hemant Dhome Post About Rahul Solapurkar
Hemant Dhome : राहुल सोलापूरकरांच्या शिवरायांविषयीच्या वक्तव्याबाबत हेमंत ढोमेची पोस्ट, “स्वस्तातल्या इतिहासाचार्यांकडे सूज्ञांनी…”
Manoj Jarange Statemet on Namdev Shashtri
Manoj Jarange : मनोज जरांगेंची नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर जोरदार टीका, “जातीयवादाचा नवा अंक…”
Loksatta book mark Patriot Alexei Navalny Russian security forces
बुकमार्क: अकाली मावळलेला झुंजार तारा

माझी एक आजी होती. फार शिकलेली वगैरे नव्हती. तिच्याकडे जात्याच्या ओव्या, पारंपरिक गाणी, लग्न समारंभातील गाणी, उखाणे, भातुकली, हादग्याची गाणी, मंगळा गौरीची गाणी, अभंग, गौळणी, ओव्या, म्हणी, वाक्प्रचार यांचा फार मोठा संग्रह होता. आजी वेळ साधून म्हणी आणि वाक्प्रचार इ.चा अचूक उपयोग करायची, तिचे ते रसाळ बोलणे नुसते ऐकत राहावेसे वाटायचे. कधी निसर्ग, कधी समाजकारण, कधी लोकव्यवहारावर टिप्पणी म्हणून या म्हणींचा वापर होत असे. कधी अचूक, मार्मिकतेने जीवनाचे सारच या म्हणींमधून आपल्या समोर मांडले जायचे. खरे तर म्हणी आणि वाक्प्रचार ही आवळी जावळी भावंडे आहेत असे म्हणायला पाहिजे. पण दोन्हीतून मराठी भाषेचे आशयदृष्टय़ा, रूपदृष्टय़ा एक वेगळेच सौंदर्य प्रतीत होते. पण दोहोत एक सूक्ष्म फरक आहे. म्हणींमध्ये आंतरिक लय अनुस्यूत असते. जी कवितेच्या ओळीच्या जवळ जाणारी असते, वाक्प्रचारांचे तसे नसते. म्हण एकाच अर्थापाशी थबकून राहाते, वाक्प्रचार कदाचित समाजप्रवाहाबरोबर, लोक रूढींबरोबर आशयदृष्टय़ा बदलत बदलत, प्रवाही होत होत आपल्यापर्यंत येतात. पण यामुळे भाषेला सौंदर्य, गती, चमत्कृती, एक सुंदर लेहेजा प्राप्त होतो. बहिणाबाई चौधरींसारख्या  प्रतिभावंत आपल्या भाषासामर्थ्यांने नवीन म्हणी निर्माण करतात. वा. गो. आपटे, डॉ. द. ता. भोसले यांसारख्या विद्वानांनी म्हणींवर खूप अभ्यासपूर्ण लेखन केलेले आहे. पण आज भाषेची ही सौंदर्यस्थळे विस्मृतीत जात आहेत. म्हणी, अलंकार, वाक्प्रचार इ.मराठी विषयाच्या प्रश्नपत्रिकातून समाविष्ट केलेली आहेत. पण भाषेची गोडी लागण्याच्या दृष्टीने इतके पुरेसे नाही. त्यासाठी अधिक जागृततेने काही करणे गरजेचे आहे. नाही तर आपण ही भाषिक श्रीमंती गमावून बसू अशी काळजी वाटते.

Story img Loader