डॉ. यश वेलणकर yashwel@gmail.com   

माणूस भावनेच्या आवेगात चुकीची कृती करतो, त्याला सत्त्वावजय चिकित्सेत ‘प्रज्ञापराध’ म्हणतात. साऱ्या शारीरिक आणि मानसिक आजारांचे ते एक कारण आहे. याचे तीन घटक आहेत. पहिला घटक म्हणजे- काय योग्य आणि काय अयोग्य हे बुद्धीला कळलेले नसते. विचारांचा आणि भावनांचा परिणाम शरीरमनावर कसा होतो, तणावाचे दुष्परिणाम कोणते आहेत, ते कसे कमी करता येतात याची माहिती नसते. मनातील भावनांचा आवेग कसा टाळायचा, विवेकबुद्धी कशी विकसित होते, सुप्तमन कसा प्रभाव गाजवते हे माहीत नसते. ‘मनोवेध’मधून मनाचे स्वरूप व मानसोपचार याविषयीची माहिती मिळेल; तिचे ज्ञानात रूपांतर करण्यासाठी त्यावर विचार करायला हवा. शंका विचारायला हव्यात आणि या विषयाचे ज्ञान वाढवायला हवे.

Health Infectious Diseases Climate Change Health news
आरोग्य: भय इथले संपत नाही…
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
GBS Pune, GBS, bacteria , private tankers, pune,
पुणे : १५ ठिकाणी खासगी टँकरच्या पाण्यातच जीवाणू असल्याचे उघड !
Tata Hospital to start super specialty hospital for cancer
कर्करोग रुग्णांसाठी टाटा रुग्णालय सुरू करणार अतिविशेषोपचार रुग्णालय
Hair , bald , Buldhana, Ayurveda, Homeopathy ,
बुलढाण्यात टक्कल पडलेल्यांना पुन्हा केस; ॲलोपॅथी, आयुर्वेद, होमिओपॅथीसह…
healthy honey
भेसळयुक्त मध कसा ओळखावा? चांगला मध शरीराला कसा फायदेशीर ठरतो?
22 health care centers closed due to local opposition have to find new location
स्थानिकांच्या विरोधामुळे २२ आरोग्यवर्धिनी केंद्र अधांतरी, नवीन जागा शोधण्याची वेळ
Nutritionist shares 5 tips to follow for good gut health know Experts opinion
“रोज आवळा खा अन् ताक प्या अन् आतड्यांचे आरोग्य सुधारा; आहारतज्ज्ञांनी सांगितलेले हे ५ खरंच उपयुक्त आहेत का?

प्रज्ञापराधाचा दुसरा घटक म्हणजे- ज्ञानाचा प्रत्यक्ष उपयोग न करणे होय. योग्य/अयोग्य काय हे बुद्धीला  पटलेले असते, पण ते कृतीत येत नाही. कारण कृती होण्यासाठी सवयी बदलाव्या लागतात. स्वयंशिस्त वाढवून स्वनियमन करावे लागते. हे करणाऱ्या शक्तीस ‘धृति:’ म्हणतात. धृति: म्हणजे नियमनशक्ती. ही वाढवण्याचा एक मार्ग योगशास्त्र आहे. ‘पातंजल योगसूत्रा’चे पहिले सूत्र ‘अथ योगानुशासनम्’ असे आहे. योग हे स्वयंअनुशासन आहे. माणसाच्या मेंदूतील ‘प्रीफ्रन्टल कॉर्टेक्स’चे हे कार्य आहे. याला न्यूरोसायन्समध्ये ‘सेल्फ रेग्युलेशन’ म्हणतात. मानवी मेंदूच्या व्यवस्थापकीय कार्यापैकी हे महत्त्वाचे कार्य. सर्व रोगांचे कारण असलेला प्रज्ञापराध टाळायचा असेल, तर धृति: बळकट करायला हवी. संकल्प करून त्यानुसार वागायला हवे. ते शक्य झाले की स्वतलाच शाबासकी घ्यायला हवी.

प्रज्ञापराधाचा तिसरा घटक साक्षीभावाचा सराव न करणे हा आहे. त्याला ‘स्मृतिभ्रंश’ म्हणतात. ‘चरकसंहिते’त- ‘तत् त्व’चा म्हणजे ‘मी साक्षी’ हा विसर म्हणजे स्मृतिभ्रंश असे स्पष्ट सांगितले आहे. ‘मी साक्षी’ याचे स्मरण म्हणजे स्मृति, सजगता स्थापित करणे होय. ‘माइन्डफुलनेस’ हा इंग्रजी शब्द  याच अर्थाने वापरला जाऊ लागला. त्याचा सराव करायचा म्हणजे आपले लक्ष कुठे आहे, याकडे लक्ष द्यायचे. बुद्धी, धृति: आणि  स्मृती बळकट करणे ही सत्त्वावजय चिकित्सा आहे. ती आजार बरे करण्यासाठी आहे तशीच ओज आणि तेज वाढवण्यासाठी आहे.

 

Story img Loader