मानवनिर्मित तंतू हे रसायने वापरूनच उत्पादित केले जातात. जशी कापडाची गरज वाढली, नसर्गिक तंतूच्या उत्पादनाच्या आणि रंगाईच्या मर्यादा माहीत झाल्या, त्या लक्षात घेऊन पुढील पावले टाकली गेली. त्याचा विचार करून त्या तंतूच्या रासायनिक रचनेशी प्रक्रिया होणारे रंग मोठय़ा प्रमाणात वापरले जाऊ लागले. या रंगांचा वापर वनस्पतिजन्य आणि प्राणिजन्य अशा दोन्ही प्रकारच्या नसíगक तंतूंसाठी करता येतो. इतकेच नाही तर वेगवेगळ्या मिश्र तंतूंकरितासुद्धा ते वापरता येतात.
रासायनिक प्रक्रियेमुळे या रंगांचा पक्केपणा इतर सर्व रंगांपेक्षा उजवा आहे. त्यामुळे याचा वापर आता सर्रास केला जातो. या रंगांची किंमत मात्र जास्त आहे. त्यामुळे रंगीत कापडासाठी, ज्या वेळी या रंगांचा वापर केला जातो, तेव्हा त्याची किंमत अधिक असते हे ओघाने आलेच. पण रंगांचा टिकाऊपणा मिळतो, त्यामुळे ही जास्तीची किंमत द्यायला ग्राहक तयार होतात.
सुती कपडय़ांच्या किमती वाढल्या, त्यामधील एक कारण हेही आहे याची सर्वानी नोंद घ्यायला हवी. रंग प्रत्येक धुण्यात फिके पडत गेले, की आपली निराशा होते. त्याचा बंदोबस्त करण्याचे काम या प्रक्रिया होणाऱ्या रंगांनी साध्य केले. त्यामुळे या रंगांचा वापर आता अग्रक्रमाने होताना दिसतो.
दीर्घकालीन फायद्याकडे लक्ष देता सुरुवातीचा जास्तीचा खर्च परवडतो असेच म्हणायला हवे. या रंगांच्या वापरामुळे आता पडद्याची बाहेरील बाजू लवकर फिकी पडणे खूप काळाने घडते. म्हणजेच पडद्यांची उपयुक्तता दीर्घकाळ टिकेल. तसेच अंगावर घालायच्या वस्त्रांबाबतीत इतर कपडय़ांना रंग लागला, अंतर्वस्त्रांना बाहेरील कपडय़ांचा रंग लागला या आणि अशा तक्रारीपण मोठय़ा प्रमाणात कमी झालेल्या आढळतात. रंगीत डाग पडून अन्य कपडे विद्रूप होण्याची वेळच आता येणार नाही, याकडे आपली वाटचाल सुरू आहे. ‘गरज शोधाची जननी’ म्हणतात त्याचा प्रत्यय इथे येतो. नवनवीन संशोधन समाजाला भेडसावणाऱ्या प्रश्नांवर उत्तरे शोधत असते, त्याचा दैनंदिन जीवनातील हा एक प्रत्यय असे म्हणावेसे वाटते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा