पशूंना रोग व आजार होणार नाहीत याची सतत काळजी घेणे आवश्यक आहे. त्याकरिता वेगवेगळ्या रोगप्रतिबंधक लसी योग्य वेळी टोचून घेणे महत्त्वाचे आहे. लस विषाणूंपासून होणाऱ्या रोगांना १०० टक्के प्रतिबंध करत नाही. काही कारणाने रोग झाले तर त्याचे मूळ शोधण्यात वेळ घालवणे धोकादायक ठरू शकते. एखाद्या रोगाची कोणती लक्षणे आपल्या पशूत दिसत आहेत, याचे निरीक्षण करून त्यांच्या नोंदी वेळोवेळी करायला हव्यात. निम्म्यापेक्षा जास्त पशूंना आजाराची सारखीच लक्षणे दिसत असल्यास ताबडतोब जवळच्या शासकीय पशुदवाखान्यात जाऊन त्याबद्दल सविस्तर माहिती द्यायला पाहिजे. ही माहिती तोंडी तसेच लेखी स्वरूपात द्यायला हवी, जेणे करून पशूंच्या आजाराची एखादी साथ आली असल्याचे वरच्या अधिकाऱ्यांना कळू शकते.
पशुवैद्यकाला आजारी पशूंची व्यवस्थित तपासणी करण्यास मदत करायला हवी. पशूला होणाऱ्या संभाव्य आजारांची पडताळणी तो करू शकतो. त्यासाठी वेगवेगळे नमुने तो गोळा करू शकतो. ते नमुने तो विशिष्ट रोगनिदान केंद्राकडे पाठवू शकतो. पशूला एखादा महत्त्वाचा आजार झाल्याची खात्री पटली तर त्याची लस बाजारात उपलब्ध आहे की नाही, हे तो पाहू शकतो. लस खरेदी करून पशूंना देण्यासाठी तो लसीकरणाचा कार्यक्रम तयार करू शकतो. लस दिल्यानंतर पशुंमध्ये रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होण्यास २१ ते ३० दिवस लागतात. त्यामुळे आजूबाजूच्या पशुपालकांना त्याची कल्पना देऊन आजार पसरू न देण्याची व्यवस्था तो करू शकतो.
जर आजार झाला तर लक्षणांवरून ताबडतोब उपचार सुरू केले जातात. उपचारांमध्ये जर लस उपलब्ध नसेल तर इतर प्रतिबंधक उपाय अवलंबले जातात.
यामध्ये इंजेक्शन दिले जाते. पोटात औषधे दिली जातात. शरीरावर लेप लावले जातात. पशूंना होणारा आजार पशुपालकाला खíचक ठरू शकतो. यादृष्टीने, पशूंचा विमा उतरवणे उपयोगी ठरते. विमा कंपनीला पशुवैद्यकाचा अहवाल पाठवून पशूला झालेल्या आजाराबद्दल कळवणे आवश्यक असते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा