खरेदी करावयाची शेतजमीन आदिवासी, सरकारी अथवा खासगी जंगल, आरक्षित म्हणून घोषित, निर्णय प्रलंबित इत्यादी बाबींची पडताळणी संबंधित महसुली अधिकाऱ्याकडून करून घेणे फायद्याचे ठरेल. भविष्यात अडचणी येणार नाहीत.
जमिनीचा खरेदी व्यवहार पूर्ण करण्याच्या तारखेपर्यंत जमीन विक्री करणाऱ्या व्यक्तीने त्या जमिनीचा सर्व प्रकारचा कर, महसूल भरले आहेत की नाही, ते पाहून जमीन बोजाविरहित केल्याची खातरजमा त्या त्या महसूल अधिकाऱ्याकडून करून घ्यावी.
विक्री करणाऱ्या/ देणाऱ्या व्यक्तीची जमीन ही त्यांच्याकडे वंशपरंपरागत आली असेल तर त्या कुटुंबातील प्रत्येक हयात वाली-वारसाची संबंधित विक्री व्यवहाराला लेखी संमती असावी. ती असल्याची खातरजमा करून मगच पुढे जावे. अशी संमती गरजेची आहे व त्यांना या व्यवहारात संमतीसाठी सामील करून घ्यावे. जर ती जमीन स्वकष्टार्जति असेल तर विक्री करणाऱ्या व्यक्तीच्या कुटुंबीयांची उदा. नवरा, बायको, मुले यांची संबंधित व्यवहारास लेखी संमती घ्यावी. त्या सर्वाना या व्यवहारात सामील करून घ्यावे. साठेखत/ इसार पावती आणि खरेदी खत या सर्व व्यवहारांतदेखील या वाली व वारसांना सामील करून घ्यावे. त्याबरोबरच कायद्याने अत्यावश्यक प्रतिज्ञापत्रे व घोषणापत्रे साक्षांकित करून घ्यावीत. उभय पक्षांनी मान्य केलेल्या मुदतीतच ही सर्व कामे करून घेऊन अंतिम व्यवहार पूर्ण करावा. यामुळे भविष्यात कोणालाही, कोणत्याही वादास सामोरे जावे लागणार नाही.
 खरेदी व्यवहार करण्यापूर्वी ती जमीन ज्या गावहद्दीत येते, त्या विभागासाठी सरकारने ठरवलेला बाजारभाव काय आहे व त्यानुसार करावयाच्या दस्तासाठी प्रचलित दरानुसार किती मुद्रांक शुल्क व नोंदणी फी भरावी लागेल, यांची माहिती संबंधित संयुक्त/ दुय्यम निबंधक यांच्या कार्यालयातून मिळवावी. त्याचप्रमाणे सरकारने घोषित केलेल्या अथवा निर्धारित केलेल्या बाजार मूल्यांपेक्षा खरेदी व्यवहाराची किंमत कमी असता कामा नये, हे पाहावे.
या कामी आवश्यकतेनुसार तज्ज्ञ वकिलांचा सल्ला घ्यावा. व्यवहाराच्या सुरुवातीपासून व्यवहार पूर्ण करेपर्यंत त्यांचे मार्गदर्शन घेऊन त्यांच्या देखरेखीखाली व्यवहार पूर्ण करावा.
वॉर अँड पीस: रसायनप्रयोग : भाग-७

दिवसेंदिवस गोरगरीब, श्रीमंत, ग्रामीण व शहरातील बहुसंख्य मंडळींचे दैनंदिन जीवनात पूर्वीसारखे स्वास्थ्य, शांतता, स्वस्थता हे गुण अभावाने दिसतात. सगळ्यांचे जीवन खूप फास्ट’ झाले आहे. मला नेहमी  माझ्याकडे आम्लपित्त, अ‍ॅसिडिटी, उलटी याकरिता येणाऱ्या रुग्णांच्या अपेक्षांची गंमत वाटते. ‘डॉक्टर, तुम्ही आम्हाला जेवणा- खाण्याच्या वेळेचे विचारू नका बुवा!  तुम्ही आपले औषध द्या आणि मोकळे करा.’ आहे की नाही रुग्णमित्रांचा अजब सांगावा! आम्लपित्त, अ‍ॅसिडिटी, उलटय़ा, पोटफुगी, पोटदुखी या विकारांचे मूळ जेवणाखाण्याच्या अनियमित वेळा असते.
तुम्ही-आम्ही जे खातो-पितो त्याच्याबरोबर चार तासांनंतरच्या काळाने पित्ताचे स्राव अमाशयाचा शेवटचा भाग व पच्चमानाशयाच्या सुरुवातीच्या भागात येत असतात.  मात्र तुम्ही कालच्या दुपारच्या एक वाजताची जेवणाची वेळ न पाळता आज दुपारी तीन वाजता जेवलात की गोंधळ होतो. कारण कालच्या हिशोबाने दुपारी पाच वाजता पित्त पोटात हजर असते. पण त्याला तिथे अन्न नसल्यामुळे काही कामच नसते. स्वाभाविकपणे ते पित्त वर वर येते. अ‍ॅसिडिटी, आम्लपित्त उलटीची भावना उत्पन्न करते. असे वारंवार होत गेले की, छातीत जळजळ, पोटफुगी व शेवटी आतडय़ात व्रण, अल्सर अशी लक्षणे बळावतात. पण  मंडळी आपली रोजची धावपळीची दीनचर्या बदलत नाहीत. जिथे मला जेवायला वेळ नाही तिथे मी रसायन औषध काय घेणार, असा प्रश्न स्वाभाविकपणे रुग्णाला व औषधोपचाराचा सल्ला देणाऱ्यालापण होतो.  कमीतकमी  घटकद्रव्ये असलेले अल्पमोली, बहुगुणी कमी खटाटोपाचे रसायन औषध  म्हणजे लघुसूतशेखर. सुवर्णसूतशेखर किंवा पित्ताची  मात्रा नव्हे हे वाचकांनी पक्के लक्षात ठेवावे. मौक्तिक, प्रवाळ, कामदुधा यांच्यातील एक औषध गोरखचिंचावलेहा बरोबर रसायन म्हणून घ्यावे. श्रीगणपती अथर्वशीर्ष फलश्रुतीत लाह्य़ांचे महत्त्व सांगितलेलेच आहे. जो राजगिऱ्याच्या, साळीच्या लाह्य़ा खाईल तो वाचेल. इति श्रीगणेशकृपा!
वैद्य प. य. वैद्य खडीवाले

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जे देखे रवी..      विज्ञानाच्या झेपा आणि धर्म
माझ्या नात्यात एक सूनबाई आहे. मोठी गोंडस. लग्नानंतर तिला रक्तदाब आढळला म्हणून तपासणी केली तर तिचे मूत्रपिंड क्षीण झाल्याचे कळले. या दोन्ही आजारांचे नाते आहे. तिला विशेष आहार सांगण्यात आला. घाबरू नकोस, खूप जगशील, पण बाळ होऊ दिलेस तर परिस्थिती हाताबाहेर जाईल, असे बजावण्यात आले, पण मातृत्वाची आस मोठी गहन असते. हिला दिवस गेले आणि त्या भानगडीत दोन्ही मूत्रपिंडे निकामी झालीच, पण बाळही चौथ्या महिन्यात पडले. मग ऊ्रं’८२्र२ सुरू झाले. अनाथ आश्रमातले बाळ वाढविण्याचा पर्याय तिने झिडकारला. ऊ्रं’८२्र२ ने जमेना म्हणून तिच्या वडिलांनी तिला  ङ्रल्लिी८ यशस्वीरीत्या दान केली. तोवर या जोडप्याची बदली इंग्लंडला झाली. बाळ मिळवीन तर माझ्या नवऱ्यापासूनच या हट्टापायी तिच्या नवऱ्याने त्याचे शुक्राणू भारतात गोठवून ठेवले. ही मधूनमधून इंग्लंडहून यायची. तिची बीजांडे काढली जायची त्यावर हे शुक्राणू टाकले जायचे. चौथ्या फेरीत गर्भाची सुरुवात झाली आणि हा गर्भ गुजरातमधल्या आणंद गावात एका स्त्रीच्या गर्भाशयात ठेवण्यात आला, पण प्रयोग फसला. तरीही ही हटली नाही. अशीच येत राहिली आणि दुसऱ्या वेळेला गर्भ टिकला, नव्हे, तर टिकले जुळे होते. जुळ्यातले एक गेले, एक जगले. ते बाळ नवऱ्याची हुबेहूब आवृत्ती आहे. या दोघांचे आयुष्य उजळले. जगण्यासाठी कारण मिळाले. हिने वजन कमी केले आणि मी तिला लग्नात बघितली होती, तशीच त्याहूनही सुंदर आणि गोंडस ती आता दिसू लागली आहे. हे पूर्वी शक्यच झाले नसते. दुसरीच्या गर्भाशयाचे राहू द्या, पण आपल्याच गर्भाशयात नवऱ्याच्या शुक्राणूपासून आणि आपल्याच बीजांडापासून बाहेर वाढवलेला गर्भ आता टाकण्यासाठी जे तंत्रज्ञान यशस्वी करण्यात आले त्याचा संशोधक एडवर्ड नावाचा तज्ज्ञ हल्लीच गेला. कल्पना करा, लाखो जोडप्यांच्या आनंदाला, सुखाला कारणीभूत ठरणाऱ्या या कृतीला ख्रिश्चन धर्मातल्या कॅथलिकांच्या पोपने प्रखर विरोध केला आणि अजूनही तो विरोध मावळलेला नाही. संतती नियमन अनैसर्गिक आहे, असाही त्यांचा आग्रह आहे. सगळ्याच धर्मामध्ये असले विक्त विचार आहेत. हल्ली पाकिस्तानात पोलिओ रोगापासून वाचविण्यासाठी लसीकरण करणाऱ्या कार्यकर्त्यांना ठार मारले जात आहे. आपल्याकडेही अज्ञान आहेच, पण धर्म संस्था नाहीत आणि आहेत त्यांच्या हातात सत्ता आणि बंदुकी नाहीत हे आपले नशीब. शिवाय कोठल्याही दगडाला शेंदूर लावला की, झाला देव असे म्हणणारे आपण ‘असेल बुवा’ असे म्हणत फारसा विरोध करीत नाही हेही बरेच. शिवाय कोणा ऋषीचे वीर्य कमळाच्या पानावर पडले. तिथे कोणी पोहायला आली आणि मूल झाले. असल्या गोष्टींचीही आपल्याकडे कमतरता नाही हेही बरेच.
रविन मायदेव थत्ते

आजचे महाराष्ट्रसारस्वत:१७ ऑक्टोबर
१८६३> कवी, नाटककार एकनाथ गणेश भांडारे यांचा जन्म. जगन्नाथाच्या ‘करुणाविलाप’च्या मराठी भाषांतराने काव्यलेखनाला सुरुवात. त्यांनी केलेल्या इंग्रजी कवितांची भाषांतरे ‘मुक्तांजली’ या काव्यसंग्रहात प्रसिद्ध. ‘कामसेन राजाचा वध’ हे त्यांचे वेश्यागमनाचे दुष्परिणाम दाखवणारे गद्यपद्यात्मक नाटक प्रसिद्ध.
१८८०> ग्रीक साहित्याचे व तत्त्वज्ञानाचे अभ्यासक गोपाळ विष्णू तुळपुळे यांचा जन्म. त्यांनी ग्रीक तत्त्वज्ञानाचा इतिहास चार खंडांत लिहिला.
१८८२>  व्याकरणकार, ग्रंथकार दादोबा पांडुरंग तर्खडकर यांचे निधन. ‘मराठी भाषेचे व्याकरण’ हे त्यांचे मराठी साहित्यातील महत्त्वपूर्ण योगदान. याशिवाय मराठी नकाशाचे पुस्तक, इंग्रजी व्याकरणाची पूर्वपीठिका, धर्म विवेचन, शिशूबोध अशी ग्रंथसंपदा त्यांच्या नावावर आहे.
१९१३> कवी दिनकर नानाजी शिंदे यांचे निधन. त्यांच्या सुमारे ३०० कविताकाव्यरत्नावलीतून प्रसिद्ध झाल्या.
१९९९ >  ख्यातनाम साहित्यिक, विविध भाषांचे जाणकार मंगेश भगवंत पदकी यांचे निधन. त्यांनी कथा, कादंबरी, नाटक या साहित्य प्रकारांमध्ये विपुल व दर्जेदार लेखन केले.
संजय वझरेकर