रासायनिक उद्योगांचा कच्चा माल म्हणजेच निसर्गाच्या रासायनिक कारखान्यांचा पक्का माल होय. जे निसर्गाने केलेले आहे त्याचा उपयोग करून मानवाने प्रगतीची नवीन पावले टाकली आहेत. निसर्गाने पृथ्वीवरच्या वायुमंडळाचे, भूमंडळाचे आणि जीवमंडळाचे आणि त्यामध्ये सातत्याने घडणाऱ्या क्रियांमधले संतुलन साधले आहे. या सर्व नसíगक क्रियांमध्ये जसे अनेक पदार्थ भाग घेतात तसेच अनेक नवीन पदार्थ निर्माण होतात. ते सर्व पदार्थ मानव स्वत:च्या बुद्धिकौशल्याने आणि गरजेप्रमाणे रासायनिक उद्योगांमध्ये कच्चा माल म्हणून वापरतो.
रासायनिक उद्योगाच्या सर्व प्रकारच्या कच्च्या मालांचे विभाजन कार्बनी आणि अकार्बनी या मुख्यत: दोन भागांत होते. हवा आणि पाणी या अकार्बनी पदार्थाचा कच्चा माल म्हणून उपयोग होतो. हवेच्या घटक वायूंपकी रासायनिक उद्योगासाठी कच्चा माल म्हणून महत्त्वाचे असलेले घटक म्हणजे ऑक्सिजन आणि दुसरा नायट्रोजन.  नायट्रोजनचा सर्वात मोठा औद्योगिक उपयोग अमोनियाच्या निर्मितीत होतो. रासायनिक उद्योगांच्या दृष्टीने कच्च्या मालाइतकेच, किंबहुना त्याहूनही जास्त प्रमाणात विविध प्रकारच्या संस्करणांसाठी लागणारा एक पदार्थ म्हणून पाण्याला फारच महत्त्व आहे. अनेक रसायने पाण्यात विरघळतात, त्यामुळे त्याला ‘वैश्विक विद्रावक’ म्हणतात. साहजिकच अनेक रासायनिक प्रक्रियांमध्ये, विशेषत: मिश्रणातील घटकांचे विलगीकरण, रसायनांचे शुद्धीकरण, स्फटिकीकरण किंवा अर्क काढणे इ. कामांसाठी पाण्याव्यतिरिक्त फारच थोडय़ा पदार्थाचा वापर होतो. बहुतेक रासायनिक वा अन्य उद्योगांमध्ये जसे तापमान वाढविण्यासाठी मुख्यत: पाण्याच्या वाफेचा उपयोग होतो तसेच तापमान कमी करण्यासाठी शीतक म्हणून गार पाण्याचा वापर करतात. पाणी हा प्रवाही पदार्थ आहे. कोणत्याही प्रकारची स्वच्छता करताना त्यामुळेच पाण्याला अग्रस्थान आहे. पाण्यात न विरघळणारे, पण भिन्न घनतेचे पदार्थ पाण्यात ढवळून वेगवेगळे करतात. जलविद्युत प्रकल्पामध्ये, खनिजांच्या उत्खननामध्ये व मोठय़ा आकाराच्या वस्तू स्वच्छ करण्यासाठी प्रचंड दाबाच्या पाण्याचा वापर केला जातो.  
अकार्बनी कच्च्या मालांमध्ये वरील पदार्थाबरोबर सल्फर, फॉस्फरस, क्लोरिन, चुनखडी आणि विविध खनिज पदार्थाचा समावेश होतो. कार्बनी कच्च्या मालांमध्ये पेट्रोलिअम पदार्थ, सजीव सृष्टी, दगडी कोळसा इत्यादींचा समावेश होतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रबोधन पर्व: लोकशाही, हुकूमशाही आणि गुंड
‘‘कम्युनिस्टांना स्वप्ने पाहण्याचा रोग जडलेला नाही. हुकूमशाही स्थापन करणे हे आमचे स्वप्न नाही, त्याबाबतची निश्चित योजना आमच्याजवळ आहे. माझ्या तत्त्वज्ञानात आणि कार्यक्रमात ‘हुकूमशाही’ हा शब्द जरूर येतो. आमच्या विरुद्ध बाजूचे माझे दोस्त आमचे वाङ्मय वाचतात आणि आमच्यावर निरनिराळ्या हेतूचे आरोप करतात. पण त्याच वाङ्मयात उपयोगात येत असलेला एक लहानसा शब्द मात्र ते विसरतात. तो शब्द म्हणजे ‘लोकशाहीप्रधान हुकूमशाही’. हुकूमशाही लोकशाहीप्रधान कशी असू शकते? लोकांनी निवडून दिलेल्या मंत्र्यांनी एखादे हुकूमशाही पद्धतीचे बिल आणणे ही अर्थातच लोकशाहीप्रधान हुकूमशाही नव्हे. लोकशाही म्हणजे बहुसंख्य लोकांच्या हितासाठी पिळवणूक करणाऱ्या अल्पसंख्य लोकांविरुद्ध अंमलात येणारी हुकूमशाही. त्याचा अर्थ असा की, पिळणाऱ्या मूठभर लोकांची सत्ता एकदा उलथून पाडल्यानंतरच त्या लोकांना नवीन राजवटीत, ती राजवट सामथ्र्यशाली होईपर्यंत मतदानाचा हक्क राहणार नाही.’’ अशा सोप्या शब्दांत कॉ. श्रीपाद अमृत डांगे यांनी लोकशाहीतील ‘बहुसंख्यांच्या हुकूमशाही’ची संकल्पना  स्पष्ट केली आहे, त्याचप्रमाणे गुंडगिरी, गुन्हेगारीबद्दल ते लिहितात-
‘‘गुंडांविरुद्ध इलाज करण्यासाठीच कायदा करून गुंडांचे उच्चाटन करता येईल हा भ्रम आपण सोडून दिला पाहिजे. वर्गभेदावर आधारलेल्या समाजव्यवस्थेतच ‘गुंड’ निर्माण होतात. त्यांना निरनिराळी नावे आहेत. आपण त्यांना ‘मवाली’ म्हणतो.. समाजातील प्रत्येक व्यक्तीला काम मिळण्याची व सुखाची शाश्वती होत नाही तोवर ‘गुंड’ राहणारच. या गुंडांपैकी काहींच्या अंगी धडाडी असते व त्यांना योग्य मार्गदर्शन करून चांगल्या ध्येयाची जोड दिली तर तेच शूरवीर होऊ शकतील. विशिष्ट ध्येय व कार्यक्रमासाठी लढणारा माणूस म्हणजे वीरपुरुष.. वेगवेगळ्या पातळीवर जे मानवी संबंध असतात, त्याचे विघटन होऊ लागले की, त्याचे रूपांतर गुन्हेगारीमध्ये होते. गुन्हेगारी ही काही स्थिर अशी संकल्पना नाही. ती दररोज बदलत असते. समाजात काय चांगले आणि काय वाईट याचीही कल्पना दररोज बदलत जाते. आपली निर्वाहाची साधने जशी बदलली तशी गुन्हेगारीची कल्पना आणि त्याचे स्वरूप बदलत गेले.’’

मनमोराचा पिसारा: सहज स्वच्छता
ग्रीसबरोबरचा फुटबॉलचा सामना जपान हरला.
जेत्या ग्रीसच्या समर्थकांनी जल्लोष केला, हुर्रेबाजी केली. ..पण प्रेक्षकांच्या हृदयावर विजय मात्र जपान्यांनी मिळवला!
सामना हरल्यावर जपानी खेळाडूंनी प्रेक्षकांना लवून नमस्कार करून देहबोलीतून ‘आरिगातो गोजायमाश्ता’ म्हटलं आणि स्टेडियममधील जपानी प्रेक्षकांनी भराभरा गार्बेज बॅग बाहेर काढल्या. रिमझिम पावसाला रेनकोट घालून सामना करीत स्टेडियममधला कचरा चटचट गोळा केला. अस्वच्छतेविरुद्ध लढणारे ते जपानी सामुराई झाले आणि स्टेडियम स्वच्छ केले. ही बातमी व्हॉटअ‍ॅपवर फिरते आहे. जपानमध्ये अशा सभा अथवा मिरवणुका झाल्याबरोबर जमा झालेले सामान्य लोक रस्ते, पदपथ आणि चौक विजेच्या वेगानं साफ करतात. काही मिनिटापूर्वी इथून मोठी शिंतोदेवाची पालखी मिरवत गेली याचा मागमूसही शिल्लक ठेवीत नाहीत. ही जपानी शिस्त प्रत्यक्षात पाहिली आणि अनुभवली आहे.
आसाक्साडोरीवरील शिंतोमंदिराबाहेर एका शनिवारी अशीज गावजत्रा भरते. तिथे फिरताना लक्षात आलं की, संध्याकाळी गजबजलेल्या या रस्त्यावर जपानी पुरुष अध्र्या चड्डीवर नाचतात. एखाददोन गणवेशधारी पोलीस नजर असतात, पण त्याची पालखीवारी पुढे सरकली की मागोमाग रस्ता स्वच्छ करणारे वारकरी सरसावतात. यंत्रमानवांची जणू काही फौज नि:शब्दपणे रस्त्यावर अवतरते. शिंतोची वारी करणाऱ्यांना परिसर अस्वच्छ करण्याचा आध्यात्मिक हक्क नसतो याची पूर्ण जाणीव तिथे आढळते. अशीच स्वच्छता इंजिनीअरची टोळी बुलेट ट्रेनवर ती टोक्यो स्थानकात थांबली की अक्षरश: धाड घालते. गुलाबी गणवेश नीटनेटका मेकअप केलेल्या स्त्री इंजिनीअर (यांना कर्मचारी न म्हणता, स्वच्छता इंजिनीअर म्हणतात) दोन्ही हातांनी गाडीचा डबा स्वच्छ करतात. काही मिनिटांचा हा खेळ झाल्यावर पुन्हा गाडीच्या डब्याला आणि इतर कर्मचाऱ्यांना लवून अभिवादन करून पुढे जातात. ही जपान्यांची भलामण नाही. अनेकदा हा अनुभव घेतला आहे.
मी या गोष्टींनी आता चकित होत नाही. वर्षभरापूर्वी एका जपानी कुटुंबात अतिथी म्हणून राहिलो होतो.
आजी-आजोबा, सूनबाई, नातवंड (मुलगा रशियात नोकरीला) असं भरगच्च कुटुंब. मित्रमैत्रिणींचा मोठा गोतावळा. मला भेटायला ही  सर्व मंडळी आपल्याकडे बोलावतात त्याप्रमाणे लेकीसुना इष्टमैत्रिणींसकट आले. मुलांचं गोकुळ एका स्वतंत्र खोलीत आणि आम्हा वडील मंडळींचा ‘साके चिकन’ सेवन करणारा दुसऱ्या खोलीत.
मुलांनी त्यांच्या खोलीत पालकांच्या भाषेत ‘उच्छाद’ मांडला होता. रडणं आणि हसणं जपानीत नसल्यानं नीट समजत होतं. उशांच्या मारामाऱ्या, उरावर बसणे, गाणी अशी रीतसर मस्ती चालली होती. परंतु जेवणाची वेळ झाली आहे असे म्हणताच सर्व मुलं शांत झाली. सर्व गोष्टींची व्यवस्थित मांडामांड केली आणि जेवायला हजर. मस्तीखोर पण शिस्तशीर.
यजमानांची नात अगदीच पिल्लू, जेमतेम दोन अडीच वर्षांची. पण चॉकलेटचं रॅपर तिने नीट उचललं, लुटुलुटु चालत कचऱ्याच्या डब्यात टाकलं आणि पुन्हा आजीच्या मांडीवर स्थानापन्न!!माझे तर डोळे भरून आले.. म्हणूनच ब्राझीलच्या स्टेडियममध्ये जपान्यांनी स्वच्छता मोहीम राबवली त्याचं नवल वाटलं नाही!

डॉ.राजेंद्र बर्वे drrajendrabarve@gmail.com