मानवी आयुष्याचा उद्देश यावर मत मांडणारे अस्तित्ववाद तत्त्वज्ञान दुसऱ्या महायुद्धाच्या काळात विकसित झाले. त्यानुसार साऱ्या वस्तू निर्माण होतानाच त्या कशासाठी आहेत, हे ठरलेले असते. म्हणजे पेन लिहिण्यासाठी, खुर्ची बसण्यासाठी आहे, हे नक्की असते. माणूस जन्माला येताना मात्र तो कशासाठी जन्माला आला आहे, हे ठरलेले नसते. तो वेळोवेळी जे निर्णय घेतो त्यानुसार त्याचे आयुष्य उलगडत जाते. अन्य साऱ्या वस्तूंचा उद्देश नक्की असतो. माणसाच्या आयुष्याला असा नक्की उद्देश कोणताही नाही. त्याचे अस्तित्व हाच उद्देश आहे, असे हे तत्त्वज्ञान सांगते; म्हणून याला अस्तित्ववाद- एग्झिस्टेन्शिअलिझम- म्हणतात. आपल्या देशातील बहुसंख्य लोक ‘सटवाई पाचव्या दिवशी बाळाचे भविष्य लिहिते’ असे मानतात. परदेशांतही अशा कल्पना आहेत, तसे तत्त्वज्ञानही आहे. स्पिनोझा हा तत्त्वज्ञ असेच मांडतो की, माणूस कोण होणार हे जन्माला येतानाच नक्की झालेले असते. आयुष्यात वेळोवेळी मी निर्णय घेतो असे त्याला वाटत असले, तरी तो भ्रम आहे. तो कोणता निर्णय घेणार हे आधीच ठरलेले असते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा