महासागर एक महाकचराकुंडी आहे अशी समजूत करून घेऊन मानवासाठी निरुपयोगी असलेले आणि म्हणून त्याज्य ठरलेले विविध प्रकारचे द्रवरूपी आणि घनरूपी पदार्थ समुद्रात फेकून देण्याची प्रथा साधारण एकोणिसाव्या शतकापासून सुरू आहे. आजमितीस प्रतिवर्षी अब्जावधी टन कचरा आणि इतर प्रदूषके थेट अथवा अप्रत्यक्षपणे समुद्रात टाकली जात आहेत. जागतिक तसेच स्थानिक पातळीवर नागरी तसेच औद्योगिक घनकचरा व सांडपाणी, टाकाऊ ठरलेले किरणोत्सारी पदार्थ, शेतीसाठी वापरण्यात आलेल्या रासायनिक खतांचे व कीटकनाशकांचे अंश, क्रूड ऑइल व तत्सम द्रवपदार्थाची वाहतूक करणाऱ्या जहाजांमधून अपघातांमुळे किंवा अन्य कारणांमुळे होणारी तेलगळती, या प्रदूषकांबरोबरच प्लास्टिकच्या कचऱ्याने सागरी प्रदूषणाच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. याशिवाय सागरी तळाचे उत्खनन करताना, जहाजांची ये-जा सुरू असताना होणारे ध्वनिप्रदूषणदेखील विशेषत: व्हेल, डॉल्फिनसारख्या सागरी जीवांसाठी अपायकारक ठरत आहे. जागतिक पातळीवर या प्रदूषणांमुळे जवळपास ८१७ सागरी प्रजातींचे अस्तित्व धोक्यात आले असून यात गेल्या पाच वर्षांत २३ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा