अनघा शिराळकर
फार मोठ्या तीव्रतेचा भूकंप झाला की प्रचंड जीवितहानी आणि वित्तहानी होते. जनजीवन विस्कळीत होते ते वेगळेच. यासाठी भूकंपविषयक सखोल संशोधन आणि तदनुषंगिक तंत्रज्ञानाचा विकास करणे अत्यावश्यक असते. म्हणूनच ऑगस्ट २०१४ मध्ये ‘भारतीय हवामान विज्ञान विभागा’तील ‘भूकंपशास्त्र कक्ष’ (साइस्मॉलॉजी युनिट, इंडियन मेटिऑरॉलॉजिकल डिपार्टमेंट), आणि केंद्र शासनाच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे ‘भूकंप धोका मूल्यांकन केंद्र’ (अर्थक्वेक हजार्ड असेसमेंट सेंटर) यांचे एकत्रीकरण करून राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्र (नॅशनल सेंटर फॉर साइस्मॉलॉजी) स्थापन करण्यात आले. केंद्र सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या अखत्यारीत हे केंद्र येते. हे केंद्र देशात घडणाऱ्या भूकंपांच्या नोंदी ठेवून, त्यासंबंधीची समग्र माहिती संकलित करून त्याविषयी संशोधन करणारी अधिकृत संस्था आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा