‘व्यक्ती तितक्या प्रकृती’ या उक्तीच्याच धर्तीवर आपण ‘मूलद्रव्यं तितके गुणधर्म’ असंही म्हणू शकतो. प्रत्येक मूलद्रव्याला स्वत:चं असं खास गुणधर्म असतात. त्यामुळेच तर त्यांच्या एकमेकांशी होणाऱ्या अभिक्रियेतून हजारो प्रकारची विविध रसायनं तयार होतात. आणि या अनेकविध रसायनांनी हे अफाट विश्व व्यापलेलं आहे, असं असलं तरी बुद्धिमान माणसाने आपल्या सोयीसाठी सर्व ज्ञात मूलद्रव्यांना ‘सात बाय अठरा’च्या कोष्टकात बसवून टाकलंय. आपल्या घरामध्ये आपल्याला एखादी वस्तू सहजी मिळावी आणि त्यांचा योग्य वेळी योग्य असा वापर करता यावा म्हणून एक शिस्तबद्ध मांडणी केलेली असते. स्वयंपाकघरात वाटय़ा, पेले, मसाल्यांचे पदार्थ, पिठं, धान्यं यांच्यातले वेगळे गुणधर्म आणि त्यांच्यात असलेलं साम्य अशा दोन्ही गोष्टी लक्षात घेऊन त्यांची शिस्तबद्ध रचना केलेली असते; तर कपाटामध्ये रोजचे कपडे, लग्नकार्याचे कपडे, थंडीचे कपडे यांचेही साम्य आणि फरक समजून घेऊन, ते रचले जातात. तीच गत मुलद्रव्यांची!
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा