शाळेतल्या वर्गात किती मुलं असावीत? म्हणजे मुलांना शिकण्याची, आपापसांत मैत्री करून एकमेकांकडून मस्ती आणि अभ्यासाचे धडे गिरविण्याची सर्वाधिक संधी मिळविण्यासाठी वर्गाच्या पटावर आणि प्रत्यक्ष हजर राहणाऱ्या मुलांची संख्या किती असावी? हा निर्णय शिक्षण खात्यांमधल्या एखाद्या ‘बाबू’नं घ्यायचा? नाही, शिक्षण
मानसशास्त्राच्या विभागानं देशोदेशीच्या शाळांमध्ये फिरून, शिक्षकांशी चर्चा करून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक दर्जाची पाहणी करून घ्यायचा, असा शासकीय निर्णय झाल्यानंतर अमेरिकेतल्या विद्यापीठांनी त्यावर कष्टानं संशोधन करून काही बाबी समोर ठेवल्या. त्या कोणत्या त्याचा विचार माल्कम ग्लॅडवेलनं आपल्या पुस्तकात अतिशय रंजकपणे मांडला आहे. मुळात मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी
मानसशास्त्र महत्त्वाची कामगिरी पार पाडतं, हाच आपल्याकडे नवा विचार असेल.
या संशोधनामध्ये टेरेसा दिब्रिटो नावाच्या शाळा मुख्याध्यापिकेचा सहभाग आहे आणि या संशोधनाला स्टुडण्ट टीचर अचिव्हमेंट रेशिओ रळअफ असं नाव आहे. टेनेसी विद्यापीठानं यात पुढाकार घेतला. टेरेसाच्या शाळेतल्या मुलांची संख्या त्या गावातल्या लोकांचं स्थलांतर झाल्यामुळे (घोस्ट टाऊन) कमी होत गेली. आपल्या वर्गात मुलांची संख्या कमी झाल्यानं शैक्षणिक दर्जा खालावला असं तिला वाटलं. आपल्याला (भारतीय वाचकांना) त्याचा धक्का बसतो, कारण आपल्याकडे मुलांची संख्या सहजच ६०-७० इतकी असते. अर्थात इतका मोठा क्लास असावा असं तिचं म्हणणं नव्हतं. १०-१२ मुलांना घेऊन हवं तसं शिक्षण देता येत नाही, असं वाटलं. मुळात वर्गात (प्राथमिक शाळेतदेखील) मुलांच्या सहभागानं शिक्षण होतं. छोटय़ा ग्रुपमध्ये शाळेतच पूर्ण करण्याचे प्रकल्प, राबवायचे असतात! (पालकांनी प्रकल्प करायचे नसतात!) इथून सुरुवात झाली आणि लक्षात आलं की, वर्गामध्ये किती मुलं असावीत याचा सर्वोत्तम (ऑप्टिमम) आकडा शोधला पाहिजे आणि तो आकडा आहे अठरा ते चोवीस! सहा-सहा जणांचे तीन ते चार गट केले आणि गटामधली मुलं बदलत राहिलं तर मुलांची परस्परांत उत्तम देवाणघेवाण होते. वर्गात काही मुलं विशेष हुशार असतात, तर बरीचशी सामान्य आणि काही त्यांच्यापेक्षाही कमी हुशार असतात. या सर्व मुलांच्या मानसिक, भावनिक गरजा अर्थातच भिन्न असतात. त्या ओळखून त्यांच्याशी ‘वन ऑन वन संवाद साधणं शिक्षकांना सहजसाध्य होतं. वर्गात २० ते २४ मुलं असली तर त्या सगळ्यांची मिळून तयार होणारी सामूहिक ऊर्जा वर्गाला रसरशीत जिवंतपणा देते.
विशेष म्हणजे, शिक्षकाला वर्गात खऱ्या अर्थानं ‘इंटरअॅक्टिव्ह’ पद्धतीने शिक्षण देता येतं वर्गामधली शिस्त अथवा पाटय़ा टाकणे हा उद्योग करावा लागत नाही.
आणि अठरापेक्षा कमी संख्या असेल तर? मुलांमध्ये परस्पर देवाणघेवाण कमी होते, क्लास आनंदमय करण्यासाठी ऊर्जा कमी पडते!!
ग्लॅडवेलनं मांडलेला हा रिसर्च वाचून थक्क व्हायला होतं आणि मानसशास्त्राचे अपरिचित आयाम लक्षात येतात, मनात थरार उमटतो. शिक्षणाचा इतका शास्त्रशुद्ध, मनोवैज्ञानिक विचार करण्याची आपली तयारी..
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा