नुकताच भेटलेला एखादा माणूस काही दिवसांनी पुन्हा भेटतो, तेव्हा मेंदूला नव्याने कोणतीही माहिती गोळा करायची नसते. आधी साठवलेली माहिती शोधायची असते. नाव, भाषा, बोलण्याची पद्धत, आवाज, चेहरा या सर्व गोष्टी विविध क्षेत्रातून मेंदूच्या पटलावर येतात- नेहमीच्या भाषेत बोलायचं तर आपल्याला ‘आठवतात’.

या भेटीत त्या माणसाबद्दल नवी माहिती कळली तर ती पूर्वी साठवलेल्या माहितीत जोडली जाते. पूर्वी याच माणसाबद्दल जे सिनॅप्स तयार झालेले आहेत, त्यात या नव्या माहितीचे नवे सिनॅप्स जोडले जातात. प्रत्येक माणसाबद्दल, प्रत्येक नव्या भेटीत नवे सिनॅप्स जोडले जातात. काही माणसं एकदम घट्ट होतात, तर काही माणसांची ओळख तात्पुरतीच राहते. तात्पुरत्या ओळखीची माणसं लवकर विस्मरणात जातात. मात्र खूप पूर्वी भेटलेली काही माणसं मात्र जशीच्या तशी लक्षात राहतात, याचं कारण त्या भेटीच्या वेळीस ती माणसं काही कारणाने महत्त्वाची वाटलेली असतात. मेंदूने तेव्हा योग्य दखल घेतलेली असते.

Heart touching video of a kid crying and asking mother to come early from work emotional video viral on social media
रडत रडत तिच्याजवळ गेला अन्…, कामावर जाणाऱ्या आईला मुलाची विनवणी, VIDEO पाहून तुमचेही डोळे पाणावतील
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Chandrashekhar Bawankule On Uddhav Thackeray
Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल; म्हणाले, “२०१९ मध्ये मोठी गद्दारी…”
in Parbhani Dr Babasaheb Ambedkar Statue and Constitution Sculpture are vandalized
आंबेडकरांचे नाव घेण्याची अपरिहार्यता
shukra gochar 2025 | venus transit in meen
Shukra Gochar: २०२५ सुरु होताच ‘या’ राशींचे नशीब पालटणार? शुक्राच्या आशीर्वादाने होऊ शकतो प्रचंड धनलाभ
Apple smart doorbell camera uses Face ID to unlock your door
Apple Smart Doorbell: आता घराचे कुलूप उघडेल चावीशिवाय! ॲपलची नवीन डोअरबेल; चेहरा बघून उघडणार दार
Tensions rise after cattle parts found under Khed Devane bridge
खेड देवणे पुलाखाली गोवंशाचे अवयव सापडल्याने तणाव
Chandra Mahadasha
Chandra Mahadasha: १० वर्ष सुरू असते चंद्राची महादशा! कुंडलीत चंद्र सकारात्मक असेल तर ‘या’ राशींना मिळते मानसिक शांती अन् आनंद

भावनांच्या आठवणी

काही आठवणी अशा असतात की कितीही वर्ष गेली तरी आपण विसरत नाही. घरातल्या आईबाबांबरोबरच्या आठवणी, बालवाडी-शाळा-कॉलेजमधले प्रसंग यातले काही प्रसंग कधीच विसरता येत नाहीत. अशा अनेक प्रसंगाच्या आठवणी आपल्या मनात असतात. यातले काही प्रसंग अंधुकसे लक्षात असतात, तर काही प्रसंग अगदी नीट लक्षात असतात. इतके नीट की, अगदी काल घडल्यासारखे वाटावेत.

ज्या प्रसंगामुळे आपल्याला खूप आनंद झालेला असतो ते प्रसंग सहजासहजी विसरत नाहीत. पण मेंदू इतका मजेशीर असतो की तो फक्त आनंदाच्या आठवणी साठवत नाही. ज्यावेळी खूप वाईट वाटलेलं असतं. अपमान झालेला असतो, असे दु:खद प्रसंगदेखील खूप लक्षात राहतात. याचं कारण स्मरण आणि भावना या दोन क्षेत्रांचा खूप जवळचा संबंध असतो. भावनांमध्ये गुंफलेल्या आठवणी विसरता येत नाहीत. ज्या वेळेस मनात कोणत्याच खास भावना नसतात ते प्रसंग मात्र लक्षात राहत नाहीत.

डॉ. श्रुती पानसे contact@shrutipanse.com

Story img Loader