पालघर : राष्ट्रीय चक्रीवादळ जोखीम शमन परियोजना अंतर्गत सातपाटी गावाला भूमिगत वाहिनीद्वारे विद्युत प्रवाह करण्याची यंत्रणा कार्यान्वित झाली असताना समुद्रकिनारी असलेल्या अन्य ३९ गावांना पुढील वर्ष दीड वर्षात अशाच पद्धतीद्वारे विद्युत प्रवाह मिळण्याची योजना मंजूर झाली आहे. त्यामुळे निमखाऱ्या वातावरणात जीर्ण होणाऱ्या विद्युत वाहिनी व उपकरणांमुळे सातत्याने खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याच्या समस्येपासून नागरिकांना आगामी काळात दिलासा मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.

वादळी वातावरणाच्या परिस्थितीत किनाऱ्यालगतच्या भागात विद्युत उपकरणे नादुरुस्त झाल्याने अनेक दिवस बाधित भाग अंधारात राहत असल्याचे तसेच दैनंदिन कामकाज बाधित होत असल्याचे दिसून आल्याने राष्ट्रीय चक्रीवादळ जोखीम शमन परियोजना अंतर्गत भूमिगत विद्युत वाहिनी टाकण्याचे काम हाती घेण्यात आले होते. पालघर तालुक्यातील सातपाटी गावात या प्रकल्पाची अंमलबजावणी पावसाळ्यापूर्वी झाली अजून वादळी वातावरणात या योजनेमुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळत असल्याचे दिसून आले आहे.

mahavitaran latest news in marathi
पुणे : घरगुती ग्राहकांच्या वीजदरात कपात
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Solar pumps of Sahaj and Rotosolar companies shut down in two days after installation
सहज व रोटोसोलर कंपन्याचे सौर पंप बसविल्यानंतर दोन दिवसांत बंद, शेतकऱ्यांची पिके जळाली
State Electricity Regulatory Commission imposes fine of Rs 1 lakh on Mahavitaran for new electricity connection without providing meter Mumbai news
मीटर न देताच नवीन वीजजोडण्या दिल्याने नाराजी; राज्य वीज नियामक आयोगाकडून महावितरणला एक लाख रुपये दंड
Speed ​​Limit, Signal Violation, Accident, Nagpur,
तुम्हीही ‘सिग्नल’ तोडता का? मग ‘हे’ वाचाच, कारण वर्षभरात तब्बल….
Airtel 90-Day Recharge Plan
Airtel चा स्वस्तात-मस्त प्लॅन! डेटा-कॉलिंगसह मिळणार भरपूर फायदे; केवळ इतक्या किंमतीत मिळेल ९० दिवसांची व्हॅलिडिटी
3000 kw of electricity generated from solar energy in raigad district
रायगड जिल्ह्यात सौर उर्जेतून ३ हजार किलोवॅट वीज निर्मिती
Privatization of 329 power substations
राज्यातील ३२९ वीज उपकेंद्रांचे खासगीकरण

हेही वाचा : पालघर : अपघातांमध्ये मृत, कायमस्वरूपी अपंगत्व आलेल्या कामगारांचे कुटुंब नुकसान भरपाईपासून वंचित

याच योजनेचा भाग म्हणून पालघर जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यापासून तीन किलोमीटर अंतरावर असणाऱ्या अन्य ३९ गावांचा या योजनेमध्ये समावेश करण्यात आला असून त्यासाठी १९९ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. सातपाटीप्रमाणेच लघु दाब विद्युत वाहिन्या (११ केव्हीए वाहिन्या) या योजनेअंतर्गत टाकण्याचे काम हाती घेण्यात आले असून या कामासाठी सध्या निविदा प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या कामांसाठी निविदा अंतिम करून पुढील वर्षी फेब्रुवारी ते मार्च महिन्या दरम्यान या गावांमध्ये टप्प्याटप्प्याने कामे सुरू करण्याचे प्रस्तावित असून ही कामे वर्षभराच्या कालावधीत पूर्ण करण्याचे अपेक्षित आहे.

हेही वाचा : तब्बल साडेचार लाख झाडांवर कुऱ्हाड, मुंबईची तहान भागवण्यासाठी वाड्यात गारगाई पाणी प्रकल्प

सद्यस्थितीत किनारपट्टीच्या गावांमध्ये अनेक विद्युत खांब व विद्युत वाहिन्या जीर्ण व गंजलेल्या अवस्थेत असून त्यामुळे तांत्रिक बिघाड उद्भवत आहेत. तसेच वादळी परिस्थितीत विद्युत वाहिनी तुटण्याचे प्रकार अथवा विद्युत खांब पडल्यामुळे अपघात होऊन प्राणहानी झाल्याच्या घटना गेल्या काही वर्षात घडल्या आहेत. भूमिगत विद्युत प्रणालीमुळे विद्युत प्रवाह खंडीत होणाऱ्या अधिकांश कारणांवर नियंत्रण येणार असून अखंडित विद्युत पुरवठा मिळण्यास किनारपट्टीच्या गावांमधील नागरिकांना आशा निर्माण झाली आहे.

पालघर वीज मंडळाच्या विभागात राष्ट्रीय चक्रीवादळ जोखीम शमन परियोजनेत समाविष्ट गावांचा तपशील उपविभागनिहाय पुढीलप्रमाणे:

  • पालघर उपविभाग- वडराई, शिरगाव
  • डहाणू उपविभाग- बोर्डी, झाई, बोरीगाव, घोलवड, नरपड, डहाणूगाव, चिखले, आंबेमोरा, खडीपाडा, बागपाडा
  • सफाळे उपविभाग- दातीवरे, खार्डी, केळवा, कोरे, डोंगरे, एडवन, मथाने, भाताने, उसरणी, दांडा खटाळी
  • बोईसर ग्रामीण उपविभाग- मुरबे, नांदगाव, आलेवाडी, नवापूर, दांडी, उनभाट, उच्छेळी, घिवली, कांबोडा, चिंचणी, वरोर, वाढवण, धुमकेत, अब्राहम, गुंगवाडा, तडीयाळे, धाकटी डहाणू

Story img Loader