नीरज राऊत

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पालघर : जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून राज्यस्तरावरील कार्यक्रम ९ ऑगस्ट रोजी जव्हार येथे कार्यक्रम करण्यासाठी शासनाने १९९७ पासून वापरात असलेल्या भव्य क्रीडांगणाची दयनीय अवस्था करून टाकली आहे. पावसाळी वातावरणात येणाऱ्या मान्यवरांच्या सुविधेसाठी या मैदानात दगड, कपची, ग्रिट व डांबराचा मारा केल्याने पंचक्रोशीतील एक महत्त्वपूर्ण मैदान खेळाच्या वापरासाठी यापुढे कुचकामी ठरणार आहे

जव्हार येथे आदिवासी दिनाचे औचित्य साधून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमासाठी यापूर्वी सरकार आपल्या दारी कार्यक्रमासाठी उभारण्यात आलेल्या व्यासपीठापेक्षा काहीपट मोठे व्यासपीठ उभारण्यात आले आहे. त्याचबरोबर पावसाचा अंदाज पाहता सुमारे ६००० नागरिक बसतील इतके भव्य वॉटरप्रूफ मंडप देखील उभारण्यात आले आहे. या व्यासपीठ व सभामंडळाच्या उभारणी दरम्यान क्रीडांगणाच्या मध्यभागी असलेली क्रिकेटची खेळपट्टी पार उघडली गेली असून मैदानात ठीक ठिकाणी दगडाच्या राशी पडल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा >>> शासन निर्णयानंतर देखील खलाशी उपेक्षित राहण्याची शक्यता; शासन निर्णयातील अस्पष्टता व गुंतागुंत ठरणार त्रासदायक

मान्यवरांचे व्यासपीठापर्यंत वाहनाने आगमन होण्यासाठी सुमारे दीड फूट दगडाचा भराव करून त्यावर लहान दगडे, कपची व दगडाची भुकटी (ग्रिट) टाकल्यानंतर त्याच्यावर डांबराचा थर टाकण्यात येणार आहे. याशिवाय सभा मंडपाच्या ठिकाणी खुर्च्या व्यवस्थित बसाव्या यासाठी खाली दगडाचा थर टाकून त्यावर प्लायवुड टाकण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे सुमारे पाच एकर क्षेत्रफळ असणाऱ्या या मैदानाची पार दैना झाली आहे. १९९७ साली या मैदानाची उभारणी करण्यास सुरुवात झाली होती. त्या ठिकाणी खडकाळ प्रदेश असल्याने अनेक अडचणींचा सामना करत २००३ च्या सुमारास हे मैदान पूर्ण करण्यात आले.

या मैदानाला राजीव गांधी स्टेडियम असे नामकरण करण्यात आले असून ते मैदान सध्या जव्हार नगर परिषदेच्या ताब्यात आहे. या मैदानावर मध्यभागी क्रिकेटचे खेळपट्टी, सभोवताली जॉगिंग ट्रॅक असून त्याचा जव्हार व परिसरातील अनेक नागरिक लाभ घेत असतात. विशेष म्हणजे आदिवासी प्रकल्प कार्यालयाच्या पाच विभागाच्या स्पर्धा या मैदानावर नियमित होत असून अनेक स्थानीय स्पर्धा देखील नियमित भरवल्या जातात. या पंचक्रोशीतील जव्हारचे मैदान महत्त्वपूर्ण मानले जात असून कार्यक्रमानंतर कोणत्याही प्रकारे दगडं काढण्याचा प्रयत्न केला तरीही खेळण्यासाठी हे मैदान आता अयोग्य ठरेल अशी शक्यता निर्माण झाली आहे.

आंदोलनाचा पवित्रा

जव्हार व परिसरातील ग्रामीण भागात गेल्या काही वर्षांपासून तरुण मुलांना मोबाईलची चटक लागली असताना अशा तरुणांची तंदुरुस्ती राखण्यासाठी जव्हार वासियांनी “मोबाईल कडून मैदानाकडे” अशी विशेष मोहीम राबवली होती. त्याचबरोबर लोकप्रतिनिधी यांनी देखील आमदार निधी मैदानाची व स्टेडियमची सुशोभीकरण आणि नूतनीकरण करण्यास वेळोवेळी हातभार लावला. अशा परिस्थितीत या मैदानाची दुरावस्था केल्याने एक लढा मैदानासाठी आंदोलन खेळण्याचा जव्हारवासीयांनी निर्धार केला आहे. जव्हार व परिसरात अशा प्रकारची अनेक ठिकाणे या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी उपलब्ध असताना जिल्हा प्रशासनाने त्याचा पुरेसा अभ्यास न करता राजीव गांधी स्टेडियमचा विचार केला याबद्दल जव्हार वासियांकडून टिका होत आहे. या कार्यक्रमानंतर मैदान पूर्ववत करावे व त्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी नागरिकांनी केली असून ‘एक लढा मैदानासाठी’ असे आंदोलन छेडण्याचा निर्धार केला आहे.

पालघर : जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून राज्यस्तरावरील कार्यक्रम ९ ऑगस्ट रोजी जव्हार येथे कार्यक्रम करण्यासाठी शासनाने १९९७ पासून वापरात असलेल्या भव्य क्रीडांगणाची दयनीय अवस्था करून टाकली आहे. पावसाळी वातावरणात येणाऱ्या मान्यवरांच्या सुविधेसाठी या मैदानात दगड, कपची, ग्रिट व डांबराचा मारा केल्याने पंचक्रोशीतील एक महत्त्वपूर्ण मैदान खेळाच्या वापरासाठी यापुढे कुचकामी ठरणार आहे

जव्हार येथे आदिवासी दिनाचे औचित्य साधून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमासाठी यापूर्वी सरकार आपल्या दारी कार्यक्रमासाठी उभारण्यात आलेल्या व्यासपीठापेक्षा काहीपट मोठे व्यासपीठ उभारण्यात आले आहे. त्याचबरोबर पावसाचा अंदाज पाहता सुमारे ६००० नागरिक बसतील इतके भव्य वॉटरप्रूफ मंडप देखील उभारण्यात आले आहे. या व्यासपीठ व सभामंडळाच्या उभारणी दरम्यान क्रीडांगणाच्या मध्यभागी असलेली क्रिकेटची खेळपट्टी पार उघडली गेली असून मैदानात ठीक ठिकाणी दगडाच्या राशी पडल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा >>> शासन निर्णयानंतर देखील खलाशी उपेक्षित राहण्याची शक्यता; शासन निर्णयातील अस्पष्टता व गुंतागुंत ठरणार त्रासदायक

मान्यवरांचे व्यासपीठापर्यंत वाहनाने आगमन होण्यासाठी सुमारे दीड फूट दगडाचा भराव करून त्यावर लहान दगडे, कपची व दगडाची भुकटी (ग्रिट) टाकल्यानंतर त्याच्यावर डांबराचा थर टाकण्यात येणार आहे. याशिवाय सभा मंडपाच्या ठिकाणी खुर्च्या व्यवस्थित बसाव्या यासाठी खाली दगडाचा थर टाकून त्यावर प्लायवुड टाकण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे सुमारे पाच एकर क्षेत्रफळ असणाऱ्या या मैदानाची पार दैना झाली आहे. १९९७ साली या मैदानाची उभारणी करण्यास सुरुवात झाली होती. त्या ठिकाणी खडकाळ प्रदेश असल्याने अनेक अडचणींचा सामना करत २००३ च्या सुमारास हे मैदान पूर्ण करण्यात आले.

या मैदानाला राजीव गांधी स्टेडियम असे नामकरण करण्यात आले असून ते मैदान सध्या जव्हार नगर परिषदेच्या ताब्यात आहे. या मैदानावर मध्यभागी क्रिकेटचे खेळपट्टी, सभोवताली जॉगिंग ट्रॅक असून त्याचा जव्हार व परिसरातील अनेक नागरिक लाभ घेत असतात. विशेष म्हणजे आदिवासी प्रकल्प कार्यालयाच्या पाच विभागाच्या स्पर्धा या मैदानावर नियमित होत असून अनेक स्थानीय स्पर्धा देखील नियमित भरवल्या जातात. या पंचक्रोशीतील जव्हारचे मैदान महत्त्वपूर्ण मानले जात असून कार्यक्रमानंतर कोणत्याही प्रकारे दगडं काढण्याचा प्रयत्न केला तरीही खेळण्यासाठी हे मैदान आता अयोग्य ठरेल अशी शक्यता निर्माण झाली आहे.

आंदोलनाचा पवित्रा

जव्हार व परिसरातील ग्रामीण भागात गेल्या काही वर्षांपासून तरुण मुलांना मोबाईलची चटक लागली असताना अशा तरुणांची तंदुरुस्ती राखण्यासाठी जव्हार वासियांनी “मोबाईल कडून मैदानाकडे” अशी विशेष मोहीम राबवली होती. त्याचबरोबर लोकप्रतिनिधी यांनी देखील आमदार निधी मैदानाची व स्टेडियमची सुशोभीकरण आणि नूतनीकरण करण्यास वेळोवेळी हातभार लावला. अशा परिस्थितीत या मैदानाची दुरावस्था केल्याने एक लढा मैदानासाठी आंदोलन खेळण्याचा जव्हारवासीयांनी निर्धार केला आहे. जव्हार व परिसरात अशा प्रकारची अनेक ठिकाणे या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी उपलब्ध असताना जिल्हा प्रशासनाने त्याचा पुरेसा अभ्यास न करता राजीव गांधी स्टेडियमचा विचार केला याबद्दल जव्हार वासियांकडून टिका होत आहे. या कार्यक्रमानंतर मैदान पूर्ववत करावे व त्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी नागरिकांनी केली असून ‘एक लढा मैदानासाठी’ असे आंदोलन छेडण्याचा निर्धार केला आहे.