मुंबई येथून हजेऱ्याकडे निघालेल्या मालवाहू जहाजाच्या इंजिन मध्ये बिघाड झाल्याने हे जहाज पालघर तालुक्यातील वडराई किनाऱ्याजवळ नांगरण्यात आले आहे. "सी सिद्धी" हे रिकामी जहाज परतीच्या प्रवासावर असून बिघाड दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. समुद्रकिनाऱ्यापासून सुमारे अर्धा नॉटिकल मैलावर आज दुपारी एक अनोळखी जहाज तरंगत असल्याचे दिसून आले. हेही वाचा >>> पालघर: दुप्पट किमतींच्या नोटा देण्याचे आमिष दाखवणाऱ्या तोतया पोलिसाला अटक याबाबत चौकशी केल्यानंतर २३ जुलै रोजी पहाटे तीन वाजून २४ मिनिटांनी मुंबई बंदरातून हजीऱ्याकडे निघालेले या जहाजाच्या इंजिन मध्ये बिघाड झाल्याने आज दुपारी एक वाजल्याच्या सुमारास वडराई किनाऱ्याजवळ हे जहाज नांगरण्यात आले. २६१५ मॅट्रिक टन माल वाहण्याची क्षमता असणारे हे जहाजाची लांबी ७९.७९ मीटर व रुंदी १५.४ मीटर इतकी असून यावरील सर्व १२ खराशी सुखरूप असल्याचे सांगण्यात आले. हे जहाज २४ जुलै रोजी सकाळी १०.३० वाजता हजीरा येथे पोहोचणे अपेक्षित होते. सध्या या जहाजा च्या इंजिन ची दुरुस्ती हाती घेण्यात आली असून या जहाजाला आवश्यकता भासल्यास खेचून (टग) करून नेण्यासाठी दुसऱ्या अन्य जहाजाला पाचारण करण्यात येईल असे सांगण्यात आले. खवळलेल्या समुद्रात तसेच वादळी वाऱ्यमुळे हे जहाज बुडू नये म्हणून विविध शासकीय यंत्रणा समन्वय साधत असल्याचे सांगण्यात आले.