नीरज राऊत

पालघर: भात उत्पादनात नेहमीच आघाडीवर असलेल्या पालघर जिल्ह्यात पावसाने ओढ घेतल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे. या जिल्ह्यात ७९ हजार हेक्टर जमिनीवर भाताची लागवड होते. मात्र, पावसाच्या उघडपीमुळे उत्पादनाचे गणितच चुकू लागले असून काही ठिकाणी या पिकांवर कीटक व बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहेत. तसेच शेतामधील तण वाढल्याने शेतकऱ्यांसाठी नवीन आव्हाने उभी राहिली आहेत.

No bird flu death reported in Dhule but 27 Rapid Response Teams activated precaution
धुळ्यात ‘बर्ड फ्लू’ प्रादूर्भावापूर्वीच २७ पथके तैनात, कुक्कुट व्यावसायिकांना सूचना
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
22 health care centers closed due to local opposition have to find new location
स्थानिकांच्या विरोधामुळे २२ आरोग्यवर्धिनी केंद्र अधांतरी, नवीन जागा शोधण्याची वेळ
Thousands of foreign birds arrived in Uran with flamingos moving due to Water bodies dried
उरणमध्ये फ्लेमिंगो नव्या पाणथळींच्या शोधात
Shetkari sangharsh samiti demands cancellation of Pune-Nashik Industrial Expressway pune
पुणे- नाशिक औद्योगिक द्रुतगती महामार्ग रद्द करावा; शेतकरी संघर्ष समितीची मागणी
maternity hospital plot for parking Borivali
बोरिवलीत प्रसूतिगृहाच्या भूखंडावर वाहनतळ; प्रसूतिगृहाची प्रतीक्षाच
Palghar bird flu updates in marathi
पालघरमध्ये बर्ड फ्लू चा शिरकाव नाही; पशुसंवर्धन विभागाने प्रतिबंधात्मक उपाययोजनांची केली अंमलबजावणी
street light repair issues in Ambernath,
पथदिव्यांची देखभाल दुरूस्ती वाऱ्यावर; अंबरनाथकरांना सोसावी लागतेय अंधारयात्रा 

जून महिन्याचे पहिले तीन आठवडे कोरडे गेल्यानंतर जिल्ह्यात मुसळधार पावसाची नोंद झाली. जुलै महिन्यात मुसळधार पाऊस झाल्याने जुलैच्या अखेरीपर्यंत जिल्ह्यात सरासरीच्या १५६ टक्के पावसाची नोंद झाली होती. मात्र ऑगस्ट महिन्यात पावसाने उघडीप घेतली आहे. २६ ऑगस्टपर्यंत या हंगामातील पावसाने सरासरी राखली असली तरीही ऑगस्ट महिन्यात पडणाऱ्या पावसाच्या तुलनेत विक्रमगड, वसई, वाडा व पालघर या तालुक्यांत ३० टक्क्यांपेक्षा कमी, जव्हार व तलासरी तालुक्यांमध्ये ३० ते ४० टक्के, तर मोखाडा व डहाणू तालुक्यात ४५ टक्के पावसाची नोंद झाली आहे.

हेही वाचा >>>राष्ट्रीय महामार्गावर प्रवासी बसचा अपघात

‘आणीबाणीची परिस्थिती नाही’

भात पीक सध्या निर्णायक स्थितीत असून येत्या आठ-दहा दिवसांत भात पिकाला फुटवे येण्याचा टप्पा येईल. अशा वेळी जमिनीत पुरेशा प्रमाणात ओलावा असणे आवश्यक असून पावसाच्या नियमित सरी पडणे तसेच काही दिवस तरी दमदार पावसाची आवश्यकता भासणार आहे. पालघर जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात पाऊस समाधानकारक झाला नसला तरी अनेक ठिकाणी दोन ते पाच मिलिमीटर पावसाची नियमित नोंद होत आहे. शेतकरी चिंतेत असला तरीही जिल्ह्यात अजूनही आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली नसल्याचे कृषी विभागातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. येत्या काही दिवसांत पावसाचा जोर वाढणार असल्याचे हवामान विभागाने संकेत दिल्याने भातशेतीसाठी आशादायक स्थिती निर्माण झाली आहे, असे सांगितले.

हेही वाचा >>>पक्षांतर्गत फुटीसाठी अर्थपूर्ण प्रयत्न; पालघर शहरासाठी १० कोटींचे राजकीय पॅकेज?

खत टंचाई..

रोपांची वाढ जोमाने होण्यासाठी पावसासोबतच रासायनिक खतांना मागणी वाढली असून कृषी सेवा केंद्रांत शेतकऱ्यांची गर्दी दिसून येत आहे. दरम्यान अनेक कृषी सेवा केंद्रात खते उपलब्ध नसल्याचे फलक झळकले असून ऐन वेळी खताची टंचाई भासू लागल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.

तण वाढल्याने डोकेदुखी..

जिल्ह्यामध्ये २५ पावसाळी दिवसांची नोंद झाली असली तरीही त्यामध्ये वसई व पालघर येथे १२ ते १६ दिवसच पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी कीटकांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्याचबरोबर काही ठिकाणी भातपिकावर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढला असून सूर्यप्रकाश असल्याने भाताबरोबर तणाची वाढ झाल्याने शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरली आहे.

Story img Loader