लोकसत्ता प्रतिनिधी

पालघर : नवी मुंबई महानगरपालिकेला विश्वासात न घेता बदल केल्याच्या अनुषंगाने आपण विधिमंडळात केलेल्या वक्तव्याचा रोख मुख्यमंत्री यांच्याकडे नसल्याचे स्पष्टीकरण आमदार गणेश नाईक यांनी पालघर येथे केले. विधिमंडळाचे अधिवेशन संपण्यापूर्वी नवी मुंबईच्या प्रश्नाबाबत बैठकीचे आयोजन करण्यात येणार असून या सर्व प्रश्नांवर समाधानकारक तोडगा निघेल असा आशावाद नाईक यांनी व्यक्त केला.

Devendra Bhuyar and Ajit pawar
Ajit Pawar : मुलींबाबत देवेंद्र भुयारांनी केलेल्या वक्तव्यावरून अजित पवारांनी केली कानउघाडणी; म्हणाले…
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
NCP office bearers in Pune decided to make Ajit Pawar Chief Minister on Tuesday
अजित पवारांना मुख्यमंत्री करण्याचा संकल्प मात्र आमदारांची मेळाव्याकडे पाठ !
BJP questioned Rahul Gandhi after a corruption case was filed against Siddaramaiah
सिद्धरामय्यांच्या पाठीशी राहणार का?भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल झाल्याने भाजपचा राहुल गांधी यांना सवाल
nitin gadkari's guarantee ramdas athawale will become minister for fourth time
नागपूर : गडकरी म्हणाले “आम्हाला गॅरंटी नाही, मात्र आठवले यांना चौथ्यांदा मंत्री होण्याची गॅरंटी…..”
aap leader Atishi
विश्लेषण: पहिल्यांदाच आमदार, पाठोपाठ दिल्लीचे मुख्यमंत्रीपद; आतिशींच्या निवडीमागे ‘आप’चे कोणते समीकरण?
Girish Mahajan, High Court, Girish Mahajan news,
मंत्री गिरीश महाजनांवर उच्च न्यायालयाची नाराजी, काय आहे प्रकरण?
Amit Shah Mumbai, Amit shah news,
Amit Shah Mumbai : महायुतीतील धुसफूस चव्हाट्यावर नको! अमित शहा यांची सूचना; पक्षाच्या निवडणूक तयारीचा आढावा

राज्याच्या अर्थसंकल्पाबाबत पत्रकारांना माहिती देण्याच्या दृष्टीने आमदार गणेश नाईक यांनी मनोर येथे पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी राज्यातील अर्थसंकल्पातील वैशिष्ट्ये नमूद करत केंद्र व राज्य सरकार शेतकरी, कामगार तसेच सर्वसामान्य नागरिकांसाठी व विशेषतः महिलांसाठी राज्य सरकारने जाहीर केलेल्या योजनांची माहिती दिली. याप्रसंगी पालघरचेनवनिर्वाचित खासदार डॉ. हेमंत सवरा, माजी खासदार राजेंद्र गावित व भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.

आणखी वाचा-पालघर: सफाळेतील जेटीचा मार्ग मोकळा, वन विभागाची जागा सागरी मंडळाकडे वर्ग करण्यास सरकारची परवानगी

नवी मुंबई महानगरपालिकेच्या महासभेत झालेल्या निर्णयांचा अनादर करताना सिडको तर्फे अंमलात आणलेल्या काही निर्णयांबाबत मुख्यमंत्री यांच्या समवेत झालेल्या बैठकीत देण्यात आलेल्या सूचनांचे सिडको अधिकाऱ्याने स्मरणपत्र देऊन देखील दुर्लक्ष केले. त्यामुळे नाईलाजाने आपल्याला त्याविषयी विधिमंडळात प्रश्न उपस्थित करावा लागल्याचे सांगितले.

मुख्यमंत्री यांना राज्यातील कानाकोपऱ्यातून दररोज हजारो पत्र येत असतात. मात्र आपण दिलेल्या पत्र व स्मरणपत्रांचे गांभीर्य अधिकारी वर्गाने लक्षात घेतली नसल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. आपण विधिमंडळात काहीही खोटे बोलले नसलो तरीही आपला रोख मुख्यमंत्री यांच्याकडे नसून मुख्यमंत्री यांच्या सूचनांचे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकावरी वर्गाकडे असल्याचे सांगत सावरासावर केली. नवी मुंबईच्या समस्या संदर्भात सोमवारी ना. उदय सामंत यांच्याबरोबर पुन्हा बैठक होणार असून अधिवेशन संपण्यापूर्वी आपण यापूर्वी उपस्थित केलेल्या प्रश्नांबाबत बैठकीत तोडगा निघेल आश्वासन देण्यात आले असल्याचे पत्रकारांना सांगितले.

आणखी वाचा-रिक्षा अपघातात शाळकरी विद्यार्थिनीचा मृत्यु; चालकासह पाच प्रवासी आणि दुचाकीस्वार जखमी

पालघर येथे जिल्हा मुख्यालय उभारताना सिडकोला देण्यात आलेले झुकते माप, सिडको ने उभारलेल्या मुख्यालयाच्या इमारतींच्या दर्जाबाबतची समस्या, मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग काँक्रीटीकरण्याच्या दर्जाबाबत उपस्थित केलेले प्रश्न, क्रीडा विभागासाठी अतिरिक्त निधीची आवश्यकता, पालघरच्या पर्यटन विकासासाठी मंजूर केलेल्या निधीची रत्नागिरी जिल्ह्याकडे केलेली वर्गवारी तसेच केंद्र व राज्याच्या योजना अंमलबजावणी करण्यास अधिकारी वर्गाची उदासीनता इत्यादी प्रश्नाबाबत आपल्याला लिखित स्वरूपात देण्याचे आवाहन करत त्याचा तातडीने पाठपुरावा केला जाईल असे आमदार गणेश नाईक यांनी आश्वासन दिले.