पालघर : पालघर जिल्ह्य़ात पर्ससीन व यांत्रिक मासेमारी पद्धतीमुळे पारंपरिक मासेमारी धोक्यात आली आहे. समुद्रामध्ये मासेमारीचे प्रमाण दिवसेंदिव कमी होत चालले आहे. मासेमारीसाठी बोटी घेऊन गेलेले मच्छीमार पुन्हा माघारी परत असून तर बंदरावरील अनेक मासेमारी बोटी किनाऱ्यावरच उभ्या आहेत.

केंद्र व राज्य सरकारचे बेसुमार मासेमारीवर नियंत्रण नाही. पुढेही नियंत्रण राखले गेले नाही तर मच्छीमार समाजावर उपासमारीची वेळ ओढवणार आहे. पर्ससीन, एलईडी व ओव्हर फिशिंगसह बोटीची वाढलेली संख्या यामुळे मासेमारी हळूहळू कमी होत चालली आहे. राज्य हद्दीमध्ये घुसखोरी करून या पर्ससीन नौका चोरटी मासेमारी करत असल्याने स्थानिक व पारंपरिक मच्छिमारांचा व्यवसाय डबघाईला आला आहे.

firecrackers banned in delhi
‘या’ राज्यात फटाक्यांवर पूर्णपणे बंदी; कारण काय? फटाक्यांमुळे शरीराचे किती नुकसान होते?
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर…
Super Typhoon Yagi Videos
Super Typhoon Yagi: खिडक्या आणि गाड्या उडाल्या, झाडं-घरं कोलमडली; चक्रीवादळाच्या तडाख्यात व्हिएतनाममध्ये हाहाकार
Plaster of Paris, eco-friendly Ganesh idol, POP,
विश्लेषण : प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी) पर्यावरणास हानिकारक कसे ठरते? पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनवणे शक्य आहे का?
Growth in major sectors of india marathi news
देशातील प्रमुख क्षेत्रांतील वाढ जुलैमध्ये ६.१ टक्क्यांवर मर्यादित
Ratnagiri,Fishing Boat Sinks in Purnagad Sea, Purnagad sea, fishing boat, Coast Guard, rescue, strong winds, rough sea,
रत्नागिरी : पूर्णगड समुद्रात मासेमारी करणारी नौका खराब वातावरणामुळे बुडाली, दोघा खलाश्यांना वाचवण्यात तटरक्षक दलाला यश
Pune, respiratory disorders, humidity, asthma, allergies, fungal growth, health experts, Sassoon Hospital, health news
पावसाळ्यातील ओलसर हवेमुळे आजारांना निमंत्रण! जाणून घ्या कशी घ्यावी काळजी…
Andheri to Dadar and Bhandup affected as Tansa water channel burst
तानसा जलवाहिनी फुटली; अंधेरी ते दादर आणि भांडुपला फटका

फार पूर्वीपासून कव पद्धतीने पारंपरिक मासेमारी करण्यात येत होती. १९९० मध्ये जीपीएस प्रणाली आल्यावर इतर जिल्ह्याच्या नौका पालघर हद्दीच्या समुद्रात शिरकाव करून बेसुमार मासेमारी करू लागले. अनेकवेळा मच्छिमारांचा समुद्रात संघर्ष झालेला आहे. त्यानंतरही विविध समस्येकडे प्रशासन दुर्लक्षच करत आहे. कर्जबाजारी होऊन मासेमारी व्यवसाय करत असून अनुदानित डिझेल परतावाही वेळेत मिळत नाही.कर्जाचा बोझा वाढतच आहे. त्यातच मासेमारीचे प्रमाण कमी झाल्याने मच्छिमारांसमोर समोर संकटावर संकटे उभी राहत आहेत. मच्छिमाराला अजूनही शेतकरीचा दर्जा नाही. त्यामुळे नुकसानभरपाईही मिळत नाही. मच्छिमार समाज चारही बाजूने समस्यांच्या जाळय़ात अडकलेला आहे. शासनाने मदत करून त्याच्या समस्या सोडवाव्यात अशी मागणी मच्छीमाऱ्यांकडून होत आहे.

सरकारच्या दुर्लक्षामुळे मच्छीमार बेरोजगार

आवश्यकता आहे. याउलट याकडे दुर्लक्ष करून सरकार मच्छिमारांना बेरोजगारीच्या खाईत लोटत आहेत, असे आरोप मच्छिमार करत आहेत. मासेमारी कमी होण्याला सरकार पूर्णपणे जबाबदार आहे. सरकार व प्रशासन यांच्या बेफिकरीमुळे मत्स्यव्यवसायावर अवलंबून असलेली मोठी रोजगाराची साखळीही नष्ट होण्याच्या मार्गावर आहे असे मच्छिमार आक्रोश व्यक्त करत सांगत आहेत.

मासेमारी कमी झाल्याने मच्छिमारांसह या व्यवसायावर अवलंबून असलेली रोजगाराची मोठी साखळी नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. सरकारकडे अनेक मागण्या करूनही दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे मच्छीमारांवरील संकटे वाढत असून अनेक संकटांमुळे तो उपासमारीच्या खाईत लोटला जात आहे. 

जयकुमार भाय, अध्यक्ष, ठाणे जिल्हा मध्यवर्ती मच्छीमार सहकारी संघ, पालघर.