बोईसर – चिल्हार रस्त्यावरील वारांगडे येथील विराज कंपनीच्या धोकादायक वळणावर शुक्रवारी संध्याकाळी भरधाव ट्रेलर व टेम्पोच्या झालेल्या भीषण अपघातात टेंपोमधील दोन जण जागीच ठार झाले.

तारापूर औद्योगिक क्षेत्राला जोडणाऱ्या बोईसर चिल्हार मार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे. वारांगडे येथील विराज कंपनीसमोरील धोकादायक वळणावर शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास अवजड ट्रेलरने लहान टेम्पोला दिलेल्या धडकेत टेम्पोमधील चालक आणि क्लिनर दोघेही जागीच ठार झाले. या रस्त्याच्या रुंदीकरणातील त्रुटी वाहन चालकांच्या जिवावर बेतत असून धोकादायक वळणावर अपघातांची मालिका सुरूच असून आत्तापर्यंत शेकडो बळी या मार्गावर गेले आहेत.

Shocking video Couple Dies, 2 Children Injured As Car Collides With Truck On Ahmedabad-Vadodara Expressway
नशीबावर विश्वास नसेल तर ‘हा’ VIDEO पाहा; कारचा चेंदामेंदा, आईवडीलांचाही मृत्यू,भयंकर अपघातानंतरही २ मुलं कशी बचावली
Best Vegetables for Vegetarians and Non-vegetarians
Vegetables for Nonvegetarians ‘ही’ भाजी मांसाहार करणाऱ्यांकरता आवश्यक…;…
4 crushed to death after sand-laden truck flips
Accident Video : रस्त्याच्या कडेला काम कारणाऱ्या कामगारांवर वाळूने भरलेला ट्रक उलटला! दोन वर्षांच्या चिमुरड्यासह चौघांचा मृत्यू
school bus and tempo collided on tamsa road ardhapur saturday afternoon at 12 30
मांजरसुंब्याजवळ डॉक्टरांच्या वाहनाचा अपघात; दोन ठार तर दोघे जखमी
truck vandalism by bikers in pune
दुचाकी नीट चालव म्हटल्याने ट्रकची तोडफोड
Murder in anger over being chased on a bike Kharghar crime news
दुचाकीवर हुलकावणी दिल्याच्या रागातून खून; खारघरमधील घटना
Accident
Accident : दाट धुक्याने घात केला! १२ प्रवासी असलेली क्रूझर कार कोसळळी कालव्यात; १० जण बेपत्ता
Man opens door finds a tiger waiting outside viral shocking video goes viral
दरवाजा उघडला आणि समोर मृत्यू उभा! एका निर्णयानं तो थोडक्यात बचावला; VIDEO पाहून तुमचाही उडेल थरकाप

हेही वाचा – पालघर: आठ कोटी रुपयांच्या कामामध्ये अनियमितता

हेही वाचा – पालघर : कवडास उन्नई बंधाऱ्याच्या उजव्या कालव्यावर अवलंबून असलेला शेतकरी आवर्तनाच्या प्रतीक्षेत, रब्बी हंगाम धोक्यात

तारापूर औद्योगिक क्षेत्र व तारापूर अणू ऊर्जा केंद्राला जोडणारा बोईसर चिल्हार हा एकमेव रस्ता असून मालवाहू अवजड, प्रवासी व खाजगी वाहने सुरळीतपणे ये – जा करण्यासाठी एमआयडीसीच्या बांधकाम विभागाकडून कोट्यावधींचा खर्च करून रस्त्याचे चौपदरीकरण करण्यात आले. मात्र या रस्त्यावरील अपघाती वळणे न काढल्यामुळे अपघात सतत होत आहेत. तर वारंगडे येथील विराज कंपनीच्या समोर असलेल्या वळणावर आतापर्यंत शेकडो अपघात झाले असून या अपघातात अनेक जण मृत्यू पावले असूनही गंभीर दखल घेतली जात नसल्याने सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

Story img Loader