-
लोकसभा निवडणुकीमुळे सध्या संपूर्ण देशात राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
-
महाराष्ट्रातही प्रचार शिगेलो पोहोचला असून शिरुर हा लोकसभा मतदारसंघ विशेष चर्चेत आहे.
-
या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार या पक्षाचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात लढत होत आहे.
-
प्रचारादरम्यान हे दोन्ही नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत.
-
दरम्यान, अमोल कोल्हे यांनी आढळराव हे पहिल्या पसंतीचे उमेदवार नाहीत, असं म्हणत त्यांची खिल्ली उडवली आहे.
-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिरूर लोकसभा मतदारसंघातून मंत्री छगन भुजबळ यांना उभं करणार होते. मात्र भुजबळ यांनी मात्र त्यास नकार दिला.
-
त्यानंतर मग आढळराव पाटलांना उमेदवारी देण्यात आली, असा दावा कोल्हे यांनी केला.
-
आढळराव पाटील हे अजित पवार यांच्यावर आरोप करत होते. आज तेच आढळराव पवार यांच्या वळचणीला जाऊन बसले आहेत. म्हणून त्यांच्याविषयी फार बोलणे उचित होणार नाही.
-
अशा शब्दांत कोल्हे यांनी आढळराव यांच्यावर टीका केली. (सर्व फोटो अमोल कोल्हे यांच्या फेसबुक खात्यावरून साभार.)
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांचा चीनला धक्का; चीनच्या वस्तूंवर लादला १०४ टक्के आयात कर, ‘व्हाईट हाऊस’कडून मोठी घोषणा