-
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेने अल्पावधीतच लोकप्रियतेचं शिखर गाठलं.
-
मालिकेतील अरुंधतीपासून ते अगदी संजनापर्यंत प्रत्येक पात्रावर प्रेक्षक मनापासून प्रेम करतात.
-
देशमुख कुटुंब प्रेक्षकांना आपलसं वाटतं. या मालिकेतील कलाकारांसाठीसुद्धा हे कुटुंब त्यांच्या अगदी जवळचं आहे.
-
दिवसाचे बारा-तेरा तास एका छताखाली शूट करत असताना त्यांच्यातले ऋणानुबंध दिवसेंदिवस द्विगुणीत होत आहेत.
-
त्यामुळे शूटिंग व्यतिरिक्तही विसाव्याचे क्षण ‘आई कुठे काय करते’ मालिकेची टीम शोधत असते.
-
नुकतंच शूटिंगच्या व्यस्त वेळापत्रकातून एक दिवस काढत या संपूर्ण टीमने क्रिकेट खेळायचं ठरवलं.
-
दिग्दर्शक रवींद्र करमरकर आणि लेखिका नमिता वर्तक यांच्या पुढाकाराने हा खास क्रिकेटचा सामना भरवण्यात आला होता.
-
टीम संजना, टीम अरुंधती, टीम अनिरुद्ध आणि टीम रवींद्र या चार टीममध्ये क्रिकेटचे सामने रंगले.
-
प्रत्येकानेच आपलं कौशल्य पणाला लावत ‘आई पी एल’ जिंकण्याचा प्रयत्न केला.
-
मात्र महाअंतिम फेरी टीम अनिरुद्ध आणि टीम संजनामध्ये रंगली.
-
‘आई पी एल’ मध्ये टीम संजनाने बाजी मारली.
-
शूटिंगच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत संपूर्ण टीमला एकत्र बांधून ठेवण्यासाठी हा स्तुत्य उपक्रम राबवल्याबद्दल सर्वांनीच दिग्दर्शक रवींद्र करमकरकर यांचे आभार मानले.

“असा असतो मराठी मुलींचा दणका”, ‘नटीनं मारली मिठी’ गाण्यावर तरुणींचा जगात भारी डान्स! VIDEO पाहून म्हणाल, वाह्ह…