-
छोट्या पडद्यावरील स्पृहा जोशी ही एक उत्तम अभिनेत्री आणि एक संवेदनशील कवयित्री म्हणून ओळखली जाते.
-
स्पृहाने आतापर्यंत विविध भूमिका साकारल्या आहेत. यामुळे घराघरात तिला एक वेगळीच ओळख मिळाली आहे.
-
स्पृहाने नुकतंच एका मुलाखतीत तिचा पती वरद लघाटे याच्यासोबत पहिल्या भेटीचा किस्सा सांगितला आहे.
-
स्पृहा ही नुकतंच तिचा पती वरदसोबत अनुरुप विवाह संस्थेच्या एका कार्यक्रमाला उपस्थित होती.
-
यावेळी तिला तिच्या लव्हस्टोरीपासून लग्नापर्यंत अनेक गोष्टी विचारण्यात आल्या. त्यावर तिने भाष्य केले.
-
या मुलाखतीत स्पृहा म्हणाली, “मी आणि वरद कॉलेजमध्ये असताना एका वृत्तपत्राचे कॉलेज प्रतिनिधी म्हणून काम करायचो. त्यावेळी तिथेच आमची ओळख झाली.”
-
“सुरुवातीला आम्हा दोघांची एकमेकांबद्दलची मत फार बरी नव्हती.”
-
“माझं वरदबद्दलचे पहिले इम्प्रेशन फारच वाईट होतं. मला तो अजिबात आवडला नव्हता.” असे स्पृहा म्हणाली.
-
“त्याला बातम्या दाखवणं, विषय सांगणं हे मला पटायचं नाही”, असे स्पृहाने म्हटले.
-
“तर दुसरीकडे वरदलाही स्पृहा एक वशीला लावून झालेली कॉलेज प्रतिनिधी वाटायची.”
-
“त्यानंतर काही महिन्यांनी आम्हाला जबरदस्ती एका प्रोजेक्टवर काम करावं लागलं. यावेळी मी आणि तो एकत्र दोन महत्त्वाचे विभाग सांभाळत होतो. तेव्हा खरंतर आमची मैत्री घट्ट झाली”, असे स्पृहाने म्हटले.
-
“आम्ही एकमेकांना डेट करायला लागल्यानंतर सुरुवातीलाच आमच्या लक्षात आलं की आमचं हे नातं लग्नापर्यंत टिकेल”, असेही तिने सांगितले.
-
“आम्ही दोघेही गांभीर्याने नात्याकडे बघणारी दोन लोकं होतो. पण आमच्या लव्हस्टोरीमध्ये कोणी कोणाला रोमँटिक प्रपोज केलं नाही”, असे ती म्हणाली.
-
“आम्ही एकमेकांना वेळ दिला. आमच्या नात्यासाठी वेळ घेतला. त्यानंतर पुढील सर्व गोष्टी बऱ्यापैकी व्यवस्थित आहेत, हे समजल्यानंतर आम्ही ठरवून लग्नाचा निर्णय घेतला”, असेही तिने सांगितले.
-
स्पृहा आणि वरद यांच्या लग्नाला १३ वर्षे उलटली आहेत. २०१४ मध्ये त्या दोघांनी लगीनगाठ बांधली.

सलग दुसऱ्या वर्षी ‘ठरलं तर मग’ झाली ‘स्टार प्रवाह’ची महामालिका! यंदाची ‘सर्वोत्कृष्ट खलनायिका’ कोण? वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी