-
दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची आज (१४ जून) रोजी दुसरी पुण्यतिथी आहे. सुशांतच्या निधनानं त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता.
-
यानिमित्ताने आपण त्याच्या आयुष्यातील अशा गोष्टी जाणून घेणार आहोत ज्या खूप कमी लोकांना माहिती आहेत.
-
सुशांतचा जन्म २१ जानेवारी १९८६ रोजी बिहारमधील पाटणात झाला. तो आपल्या ५ भावंडांपैकी सर्वात लहान होता. तो १२ वीला असतानाच त्याच्या आईचा मृत्यू झाला.
-
त्याने अभिनय क्षेत्रातील स्वप्न पूर्ण करण्यासाठी इंजिनिअरिंगचं शिक्षण अर्धवट सोडलं होतं.
-
सुशांतला नृत्याची प्रचंड आवड होती. त्यासाठी त्याने शैमक देवरकडून नृत्याचे धडे घेतले होते. तर बॅरी जॉन्स येथे अभिनयाचं शिक्षण घेतलं.
-
२००६ मध्ये कॉमनवेल्थ गेम्सच्या कार्यक्रमात ऐश्वर्या रायने डान्स केला. त्यावेळी सुशांतने गर्दीत बॅकग्राऊंड डान्सर म्हणून काम केलं होतं.
-
सुशांतला खगोलशास्त्रात प्रचंड रस होता. इतकंच नाही सुशांतने चंद्रावर जमिनीचा एक तुकडा देखील विकत घेतला होता.
-
२०१३ मध्ये ‘काय पो छे’या चित्रपटातून सुशांतने बॉलिवूडमध्ये प्रमुख अभिनेता म्हणून एन्ट्री केली. त्यापूर्वी २०१० मध्ये राझ या चित्रपटात सहकलाकार म्हणून भूमिका साकारली होती.
-
सुशांत राजपूत अमेरिकन सुपर मॉडेल केंडल जेनरसोबत मे २०१७ मध्ये वोगमध्ये (Vogue) झळकणारा एकमेवर बॉलिवूड कलाकार ठरला.
-
सुशांत इंटरनॅशनल लुनार लँड रजिस्ट्रीचा ३ वर्षे सदस्य होता. त्याने फ्रान्सच्या आंतरराष्ट्रीय अंतराळ विद्यापीठाला भेट देण्याचंही ठरवलं होतं.
-
सुशांतला गिटार शिकण्याची फार उत्सुकता होती. मृत्यूच्या काही महिन्याआधी तो गिटार शिकत होता. यासाठी त्याने क्लासही लावला होता.
-
छोट्या पडद्यावरील ‘किस देश में है मेरा दिल’ या मालिकेमध्ये सुशांतनं प्रीत जुनेजा ही भूमिका साकारली. या मालिकेनंतर सुशांतला ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेची ऑफर मिळाली.
-
पवित्र रिश्ता या मालिकेमुळे सुशांतला विशेष लोकप्रियता मिळाली.
-
‘केदारनाथ’, ‘छिछोरे’, ‘एम. एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी’, ‘दिल बेचारा’, ‘पीके’, ‘शुद्ध देसी रोमान्स’, ‘काय पो छे’ यांसारख्या अनेक हिट चित्रपटांमध्ये सुशांतने भूमिका साकारली.
-
त्याच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली होती.

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”