-
अनुपमा हा सध्या टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय शो आहे.
-
या मालिकेतील कलाकारही घरोघरी प्रसिद्ध झाले आहेत.
-
या शोमध्ये बरखा कपाडियाच्या भूमिकेत अभिनेत्री अश्लेषा सावंत दिसत आहे.
-
दोन दशकांपासून टीव्ही इंडस्ट्रीत कार्यरत असलेल्या अश्लेषाने अनेक मालिकांमध्ये काम केलंय.
-
अश्लेषाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल तुम्हाला माहित नसेल, पण ती गेल्या २० वर्षांपासून लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत आहे.
-
अश्लेषा सावंत आणि अभिनेता संदीप बसवाना जवळपास दोन दशकांपासून एकत्र आहेत, पण त्यांनी लग्न केलं नसून त्यांना मुलंही नाहीत.
-
टीव्हीवरील एकेकाळची लोकप्रिय मालिका ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’मधून इंडस्ट्रीला अनेक स्टार कलाकार मिळाले.
-
या मालिकेत संदीप बसवाना आणि अश्लेषा सावंत यांच्याही महत्त्वाच्या भूमिका होत्या.
-
पण दोघांची पहिली भेट २००२ मध्ये आलेल्या ‘कमल’ मालिकेत झाली होती.
-
तेव्हा दोघंही १८-२० तास एकत्र शूटिंग करायचे, त्यामुळे दोघांमध्ये जवळीक निर्माण झाली आणि मग दोघेही एकत्र राहू लागले.
-
तेव्हापासून आजपर्यंत दोघेही एकत्र राहत आहेत.
-
संदीप आणि अश्लेषा २० वर्षांपासून एकत्र राहतायत. आम्ही लग्न केलं नसलं तरी आमचं नातं लग्नापेक्षा कमी नाही, असं संदीप सांगतो.
-
‘आमचं एकमेकांवर प्रेम आहे आणि जोपर्यंत आमच्यात प्रेम आहे तोपर्यंत आम्ही एकत्र राहू, असं वचन आम्ही एकमेकांना हे वचन दिलंय,’ असंही संदीपने सांगितलं.
-
‘मुलं होऊ देण्याचा आपला कोणताही विचार नाही. पण ज्यावेळी आम्हाला मूल हवं असेल तेव्हा आम्ही दत्तक घेऊ, कारण जगाची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे,’ असं संदीपने स्पष्ट केलं.
-
दरम्यान, अनुपमा मालिकेत अश्लेषाची भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरल्याचं दिसतंय. (फोटो सौजन्य – अश्लेषा सावंत इन्स्टाग्राम)

५ मार्चनंतर पैसाच पैसा! गजकेसरी राजयोगामुळे ‘या’ तीन राशींना मिळेल अपार श्रीमंती, होईल अचानक धनलाभ