-
आपल्या उत्तम नृत्यशैलीमुळे प्रेक्षकांच्या नजरा खिळवून ठेवणारी अभिनेत्री म्हणून मानसी नाईकला ओळखले जाते.
-
मानसीची ‘वाट बघतोय रिक्षावाला’, ‘बाई वाड्यावर’ ही गाणी तुफान गाजली. त्यामुळे मानसी नाईक हे नाव घराघरात पोहोचलं आहे.
-
मानसी नाईकचा आज (३ फेब्रुवारी) वाढदिवस आहे. पण सध्या ती तिच्या वैवाहिक आयुष्यामुळे चर्चेत आहे.
-
मानसी नाईकने काही महिन्यांपूर्वी तिचा पती प्रदीप खरेरा यांच्यापासून घटस्फोट घेणार असल्याचे सांगितले आहे. तिने याबद्दल अर्जही दाखल केला आहे.
-
काही महिन्यांपूर्वी मानसी नाईकने एका मुलाखतीत तिचे आणि तिच्या पतीचं नेमकं काय बिनसलं याबद्दलही खुलासा केला होता.
-
मानसी नाईक नुकतंच ‘हिंदुस्तान टाइम्स’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत मानसी नाईकने पहिल्यांदा मागच्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या घटस्फोटाच्या चर्चांवर मौन सोडलं.
-
“माझ्या घटस्फोटाबद्दल सुरू असलेल्या चर्चा खऱ्या आहेत. मी खोटं बोलणार नाही.”
-
“मी घटस्फोटासाठी अर्ज दिला आहे आणि यासंबंधी प्रक्रियेला आता सुरुवातही झाली आहे. मी आता या क्षणाला खूपच दुःखी आहे.” असे तिने म्हटले होते.
-
त्यानंतर मानसी नाईकने तिच्या घटस्फोटामागची कारण सांगितली आहे.
-
“आमच्यात नेमकं काय चुकलं हे सांगणं आता माझ्यासाठी कठीण आहे.”
-
“आमच्यात काही गोष्टी ठीक होऊ शकल्या नाहीत. पण हे सगळं खूपच वेगात घडलं.”
-
“आजही माझा प्रेमावर विश्वास आहे. मला पुन्हा प्रेम करायचं आहे. पण एक वेळ अशी होती जेव्हा मला माझं कुटुंब हवं होतं आणि त्यामुळे मी लग्न केलं.”
-
“अर्थात तेही सर्व खूपच घाईघाईत झालं.”
-
“मला वाटतं कदाचित तिथेच काहीतरी चुकलं. या लग्नाच्या नात्यातून वेगळं होण्याची वेळ आता आली आहे.”
-
“त्याच्याबद्दल आणि त्याच्या कुटुंबाबद्दल मला कायम आदर आहे.”
-
“पण एक स्त्री म्हणून माझा स्वाभिमान आणि स्वतःची काही मतंही महत्त्वाची आहेत.”
-
“एखाद्या व्यक्तीला आपण सोडून देऊ एवढ्या खालच्या थराला ती व्यक्ती जाऊ शकते हे समजून घेणं माझ्यासाठी गरजेचं होतं.”
-
“मला आता या सगळ्या गोष्टी मागे सोडायच्या आहेत.”
-
“आता मला माझ्या करिअरवर लक्ष केंद्रित करायचं आहे.”
-
“सध्या एक कलाकार म्हणून माझ्यासाठी माझं कुटुंब, माझा मित्रपरिवार, मी स्वतः आणि माझे प्रेक्षक, चाहते हेच महत्त्वाचं आहे.”
-
“कधी कधी तुमचा माणसांवरील विश्वास उडतो आणि हेच माझ्याबाबतीत घडलं.”
-
“मला भावनिकदृष्ट्या आधाराची गरज होती. पण दुर्दैवाने त्या नात्यात असं काहीच घडलं नाही.”
-
“जर एकाच व्यक्तीला कायम समर्थन मिळत असेल आणि दुसऱ्या व्यक्तीला ते मिळत नसेल तर मला वाटतं अशा नात्यातून बाहेर पडणं नेहमीच चांगलं.”
-
“जर तुमच्या नात्यात हा समजूतदारपणा नसेल तर ती तुमच्यासाठी धोक्याची सूचना आहे”, असे मानसी नाईकने म्हटले होते.

‘या’ तारखेला जन्मलेल्या लोकांना आयुष्यात खूप उशीरा मिळतो पैसा, धन-संपत्ती; वयानुसार सुधारते आर्थिक परिस्थिती