-
मराठी अभिनेते शरद पोंक्षे यांनी हिंदू धर्म वाचवण्याची गरज असल्याचं वक्तव्य केलं आहे. त्यांनी नुकतीच ‘गप्पा मस्ती’ या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली.
-
यावेळी भगवद्गीता की संविधान? यापैकी एक निवडावं लागलं तर ते काय निवडतील हेही त्यांनी सांगितलं. तसेच भारत-पाकिस्तानच्या फाळणीवरही त्यांनी भाष्य केलं.
-
मी कट्टर हिंदुत्ववादी, सावरकरवादी, सनातन धर्म मानणारा आहे. जर मला कुणी ‘शरद भगवद्गीता की संविधान?’ असा प्रश्न विचारला, तर एका क्षणाचाही विलंब न लावता मी संविधान असं उत्तर देईन.- शरद पोंक्षे
-
माझी भगवद्गीता नंतर येईल, संविधान पहिलं येईल. मला संविधान म्हणायला क्षणही लागणार नाही. – शरद पोंक्षे
-
मी जर उद्या अमेरिकेत स्थायिक झालो, तिथलं नागरिकत्व घेतलं आणि ठरवलं की आता आयुष्य अमेरिकेत घालवायचं आहे तर अमेरिकेचं संविधान, त्यांची घटना माझ्यासाठी प्रायोरिटी असेल. – शरद पोंक्षे
-
घरात भगवद्गीता, जय श्री राम सगळं करेन. मी जंगी देवघर बांधेन, सकाळ, दुपार संध्याकाळ मी पूजा करेन. पण बाहेर पडलो की मी अमेरिकन असेन. – शरद पोंक्षे
-
याच कारणामुळे पासपोर्टसाठी हिंदुंना जगभरात कुठेही अडचणी येत नाही. हिंदू नावं दिसली की लगेच पासपोर्ट मिळतो. – शरद पोंक्षे
-
पण खान, सय्यद अशी मुस्लीम नावं आली की थांबवतात. शांततेचा धर्म आहे म्हणून एकीकडे बोंबाबोंब करता, मग एकही मुस्लीम देश शांत का नाही? – शरद पोंक्षे
-
तिथे त्यांना मारायला हिंदू नाहीयेत ना, मग पाकिस्तान एवढं का धगधगतंय? त्यांना त्यांचा वेगळा देश हवा होता, तो घेतला ना. मग राहा की आनंदाने शांत. – शरद पोंक्षे
-
वेगळे झाले तरी त्यांची काही भावंडे भारतात राहिली. आमचे तिकडे जात नाहीत. – शरद पोंक्षे
-
शरद पोंक्षे यांनी भारत पाकिस्तानच्या फाळणीवरही भाष्य केलं.
-
फाळणी झाली तेव्हा पाकिस्तानात १५ टक्के हिंदू होते, ते आता फक्त अर्धा टक्का उरलेत. – शरद पोंक्षे
-
भारतात ८ टक्के मुस्लीम होते ते आता २३ टक्क्यांवर आलेत. तरी हिंदू राष्ट्र वाईट? हे सगळं कधी संपणार? असं शरद पोंक्षे म्हणाले.
-
जोपर्यंत हिंदू या देशात बहुसंख्य आहेत, तोपर्यंतच या देशात धर्मनिरपेक्षता, सर्वधर्मसमभाव टिकून आहे. – शरद पोंक्षे
-
ज्यादिवशी हिंदू ४९ टक्के होतील आणि मुस्लीम ५१ टक्के होतील, त्यादिवशी सगळं संपलेलं असेल, असंही शरद पोंक्षे म्हणाले.
३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख