-
८० च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक असलेल्या रती अग्निहोत्रींनी बॉलीवूड इंडस्ट्रीत आपली खास ओळख निर्माण केली होती. ६३ वर्षीय अभिनेत्रीने वयाच्या १६ व्या वर्षी दाक्षिणत्य चित्रपटांमधून आपल्या करिअरची सुरुवात केली.
-
१९७९ मध्ये प्रदर्शित झालेला ‘पुडिया वरपुकल’ हा त्यांचा पहिला चित्रपट होता. हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला. चित्रपटाच्या यशानंतर त्याला आणखी चित्रपटांच्या ऑफर्स येऊ लागल्या.
-
अभिनेत्रीने १९८१ मध्ये ‘एक दुजे के लिए’ मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. हा चित्रपट सुपरहिट ठरला. यानंतर अभिनेत्रीकडे हिंदी चित्रपटांची रांग लागली.
-
दाक्षिणात्य ते बॉलिवूडमध्ये आपलं नाव कमावणाऱ्या अभिनेत्री रती अग्निहोत्री करिअरच्या शिखरावर होत्या, तेव्हा त्यांनी बिझनेसमन अनिल वीरवानीशी १९८५ मध्ये लग्न केलं.
-
लग्नानंतर पती अनिल वीरवानीने त्यांच्यावर चित्रपटात काम न करण्यासाठी दबाव आणण्यास सुरुवात केली. लग्नाच्या एका वर्षानंतर अभिनेत्रीने मुलगा तनुजला जन्म दिला.
-
मुलाच्या जन्मानंतर त्यांच्या आयुष्यात आनंदाऐवजी भांडण चालू झालं. कदाचित याच कारणामुळे लग्नाच्या चार वर्षानंतर अभिनेत्रीने जवळपास १३ वर्षांच्या करिअरमधून ब्रेक घेतला होता.
-
रती आणि त्यांच्या पतीतील भांडण कालांतराने खूप वाढले. रती यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की त्यांनी तब्बल ३० वर्षे घरगुती हिंसाचार सहन केला.
-
त्यांनी असंही म्हटलं होतं की त्या ३० वर्षे फक्त मुलगा तनुजसाठी गप्प राहिल्या, कारण त्यांना मुलाला भांडणापासून दूर ठेवायचे होते.
-
२०१५ मध्ये रती अग्निहोत्रींनी पती अनिल विरवानी यांच्यावर चाकूने वार करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केला होता. यासोबतच त्यांनी पतीविरुद्ध मारहाणीची तक्रार दाखल करून घटस्फोट घेतला होता.
(फोटो : इंडियन एक्सप्रेस)

‘एमपीएससी’च्या इतिहासात पहिल्यांदाच २७९५ जागांसाठी जाहिरात, ‘या’ पदवीधरांना अर्जाची संधी…