-
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेचे नवे पर्व सुरु झाले आहे.
-
मालिकेचे कथानक २५ वर्षांनी पुढे सरकलं असून जयदीप-गौरीच्या मृत्यूनंतर त्यांच्याच रुपात नित्या-अधिराजने पुनर्जन्म घेतला आहे.
-
पुनर्जन्माचा हा प्रवास उत्कंठावर्धक आहेच त्याबरोबरच मालिकेतली अनेक नवी पात्र प्रेक्षकांची वाहवा मिळवत आहेत.
-
नित्या-अधिराजबरोबरच सध्या ‘राजमा’ ही व्यक्तिरेखाही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे.
-
‘राजमा’ बोलू शकत नाही.
-
लहान असताना ‘राजमा’ला जबरदस्त मानसिक धक्का बसला आणि त्यात तिची वाचा गेली.
-
‘राजमा’चा भूतकाळ नेमका काय आहे? नित्या आणि जयदीपबरोबर ‘राजमा’चे काय नाते आहे? याची कमालीची उत्सुकता आहे.
-
‘राजमा’ची भूमिका साकारतेय अभिनेत्री मृण्मयी गोंधळेकर.
-
मृण्मयी गोंधळेकर मुळची पुण्याची आहे.
-
लहानपणापासूनच मृण्मयीला नृत्याची आवड होती.
-
हीच आवड जोपासत मृण्मयीने शास्त्रीय नृत्याचं प्रशिक्षण घेतले आहे.
-
नृत्याची आवड आणि अभिनयाच्या वेडापायी तिने मुंबई गाठली.
-
मृण्मयीने अनेक रिऍलिटी शोजमध्ये सहभाग घेतला आहे आणि ती विजेतीही ठरली आहे.
-
अनेक मालिकांमध्येही मृण्मयीने लक्षवेधी भूमिका साकारल्या आहेत.
-
स्टार प्रवाहबरोबरची तिची ही पहिली मालिका आहे.
-
इतक्या लोकप्रिय मालिकेचा भाग होताना अतिशय आनंद होतोय अश्या शब्दात तिने आपली भावना व्यक्त केली.
-
‘राजमा’ बोलू शकत नाही. न बोलता भावना व्यक्त करणं आव्हानात्मक आहे.
-
अश्या पद्धतीचं पात्र मृण्मयीने याआधी साकारलेलं नाही.
-
त्यामुळे ‘राजमा’ साकारताना नवनव्या गोष्टी शिकायला मिळत असल्याचं मृण्मयी म्हणाली.
-
(सर्व फोटो सौजन्य : स्टार प्रवाह आणि मृण्मयी गोंधळेकर/इन्स्टाग्राम)
३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख