-
अभिनेते नाना पाटेकर सध्या त्यांचा आगामी मराठी चित्रपट ‘ओले आले’मुळे चर्चेत आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने दिलेल्या मुलाखतीत त्यांनी राजकारणावर भाष्य केलं.
-
‘झी २४ तास’ ला दिलेल्या मुलाखतीत नाना पाटेकर यांनी एकेकाळी शरद पवार त्यांचे हिरो होते, असा खुलासा केला.
-
अजित पवारांना खूप जवळून पाहत होतात, त्यांनी शरद पवारांची साथ सोडली, त्यानंतर तुमची काय प्रतिक्रिया होती? असा प्रश्न नाना यांना या मुलाखतीत विचारण्यात आला.
-
त्यावर ते म्हणाले, “मला कळतच नाहीये. मला राजकारणातील कोणत्याच गोष्टीबद्दल आता भाकित करताच येत नाहीये, बोलताच येत नाहीये.”
-
नाना पाटेकर पुढे म्हणाले, “मी एकेकाळी म्हणायचो शरद पवार माझे हिरो होते. आमच्या वयात १० वर्षांचं अंतर आहे. हा माणूस महाराष्ट्रासाठी काहीतरी ग्रेट करेल असं वाटायचं.”
-
“तुम्हाला जेव्हा तुमच्या कळत्या, न कळत्या वयात काही गोष्टी वाटत असतात आणि त्यावेळी तो माणूस सातत्याने काहीतरी करतोय तेव्हा तुम्हाला अजून आनंद होतो,” असं ते म्हणाले.
-
पुढे ते म्हणाले, “नंतर नंतर थोडासा भ्रमनिरास व्हायला लागतो.”
-
कारण तुमचीही राजकारणाबाबत काही ठाम मतं होऊ लागतात. ती बरोबर, चूक हा भाग अलाहिदा. – नाना पाटेकर
-
कालांतराने तुमचे हिरो बदलत राहतात. पण खेळातले वगैरे हिरो बदलले तर काही वाटत नाही. – नाना पाटेकर
-
पण इथे (राजकारणात) तुमचे कयास नसतात तर तुमच्या इच्छा असतात. इथे तुम्ही भावनिकरित्या खूप गुंतलेले असता. त्यामुळे इथे हिरो बदलले की वाईट वाटतं.- नाना पाटेकर
-
“एखाद्याच्या बोलण्यात सातत्य नसेल तर मी कसा विश्वास ठेवायचा?” असा प्रश्न नाना पाटेकरांनी उपस्थित केला.
-
(नाना पाटेकर फोटो – मल्हार पाटेकर फेसबूक, शरद पवार फोटो ANI)

शनीदेव घेऊन आले सुखाचे दिवस; मकर राशीची साडेसाती संपताच ‘या’ तीन राशींना गडगंज श्रीमंतीचे सुख लाभणार