-
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मन धागा धागा जोडते नवा’ मालिकेतील ‘आनंदी-सार्थक’च्या जोडीला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळत आहे.
-
सार्थक हा आनंदीवर जीवापाड प्रेम करतो.
-
आपल्या प्रत्येक कृतीतून आनंदीवरचं प्रेम आणि तिच्याविषयी वाटणारा आदर तो व्यक्त करत असतो.
-
सार्थक सारखा समजून घेणारा आणि चांगल्या-वाईट प्रसंगांमध्ये खंबीरपणे पाठीशी उभा रहाणारा जोडीदार मिळाला तर आयुष्य सुखकर होतं याची अनुभूती ही मालिका पहाताना होते.
-
घटस्फोटानंतरही प्रत्येकाला आपलं आयुष्य पुन्हा नव्याने जगण्याचा अधिकार आहे हा विचार पटवून देणारी ही मालिका म्हणूनच प्रेक्षकांना जवळची वाटते.
-
सार्थकने जरी आनंदीला पत्नीचे हक्क दिले असले तरी राजाध्यक्ष कुटुंबाने मात्र तिला मनापासून स्वीकारलेलं नाही.
-
सार्थकच्या आग्रहाखातर आता त्याच्या आईने आनंदीला सून म्हणून सिद्ध करण्याची एक संधी देण्याचं ठरवलं आहे.
-
आनंदीने देखिल हे आव्हान स्वीकारलं असून पुन्हा एकदा सन्मानाने ती सासरी गृहप्रवेश करणार आहे.
-
स्वत:मध्ये सकारात्मक बदल करत आनंदी आयुष्याची नव्याने सुरुवात करणार आहे.
-
नव्या रुपात आणि नव्या आत्मविश्वासाने तिने स्वत:ला सिद्ध करायचं ठरवलं आहे.
-
सार्थकच्या साथीने आनंदी हे नवं आव्हान कसं पूर्ण करणार हे मालिकेच्या पुढील भागांधून पाहायला मिळेल.
-
(सर्व फोटो सौजन्य : स्टार प्रवाह/इन्स्टाग्राम)
![Haldi Ceremony Viral Video](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/New-Project-2025-02-06T184910.118.jpg?w=300&h=200&crop=1)
‘त्याला पाहून ती ढसाढसा रडली…’ तिच्या हळदीचा भावनिक क्षण; काळजाला भिडणारा VIDEO एकदा पाहाच