-
स्टार प्रवाहच्या ‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेत सध्या ऐश्वर्या-सारंगच्या लग्नाची धामधूम सुरु आहे.
-
हळद, मेहंदी आणि संगीत पार पडल्यानंतर अखेर विवाहसोहळ्याचा तो क्षण जवळ आला आहे.
-
ऐश्वर्याचं लग्न सारंगबरोबर होणार की सौमित्रबरोबर याची उत्सुकताही क्षणाक्षणाला वाढत आहे.
-
हळद, मेहंदी आणि संगीत सोहळ्यातल्या लक्षवेधी लूकनंतर आता विवाहसोहळ्यात रणदिवे आणि विखेपाटील कुटुंबाने पारंपरिक पोशाखाला पसंती दिली आहे.
-
लग्नात पैठणीची थीम असल्यामुळे संपूर्ण कुटुंब पैठणीच्या रंगात न्हाऊन निघालं आहे.
-
ऐश्वर्या आणि जानकीने नऊवारी साडी आणि पारंपरिक मोत्यांच्या दागिन्यांना पसंती दिली आहे.
-
तर तिकडे ऋषिकेशचं पैठणी जॅकेट सर्वांचं लक्ष वेधून घेत होतं.
-
विवाहसोहळ्यातल्या या लूकविषयी सांगताना जानकी म्हणजेच अभिनेत्री रेश्मा शिंदे म्हणाली, गेल्या दहा-बारा दिवसांपासून मालिकेत लग्नाच्या या सीनची धावपळ सुरु आहे.
-
आम्हा कलाकारांबरोबरच सगळ्या तंत्रज्ञ मंडळींची देखिल कसरत सुरु आहे.
-
प्रत्येकाच्याच पेहरावाकडे विशेष लक्ष दिलं जात आहे.
-
पारंपरिक लूक असल्यामुळे सीनसाठी तयार व्हायला दोन अडीच तास लागतात.
-
आमचा लूक डिझाईन करणाऱ्या प्रत्येकाचच कौतुक आहे.
-
जानकीच्या साड्यांना प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.
-
मला खात्री आहे लग्नातला लूकही प्रेक्षकांना आवडेल.
-
या मालिकेचं कथानक दिवसेंदिवस उत्कंठावर्धक होतंय.
-
(सर्व फोटो सौजन्य : स्टार प्रवाह आणि रेश्मा शिंदे/इन्स्टाग्राम)

नवरदेव पाहताच नवरी भारावली! पाहुण्यांसमोरच केला भन्नाट डान्स; नवरदेवही लाजला…हौशी नवरीचा VIDEO एकदा पाहाच