-
‘माझिया प्रियाला प्रित कळेना’, ‘तू तिथे मी’, ‘हे मन बावरे’ या मालिकांमधून अभिनेत्री मृणाल दुसानिस घराघरांत लोकप्रिय झाली
-
छोट्या पडद्यावर यश मिळाल्यानंतर करिअरच्या शिखरावर असताना २०१६ मध्ये अभिनेत्रीने लग्नगाठ बांधली.
-
लग्नानंतर काही वर्षे मालिकेत काम केल्यावर मृणाल नवऱ्याबरोबर अमेरिकेला राहायला गेली.
-
आता नुकतीच चार वर्षांनी ती भारतात परतली आहे.
-
तुम्हाला माहितीये का? मृणालचं लग्न अरेंज मॅरेज पद्धतीने जमलं आहे. नुकत्याच एका मुलाखतीत अभिनेत्रीने तिचं लग्न कसं जमलं याबद्दल खुलासा केला आहे.
-
मृणाल दुसानिस म्हणाली, “आमचं अरेंज मॅरेज झालं आहे. माझ्या बाबांच्या ओळखीच्या एका काकांनी आम्हाला नीरजचं स्थळ सुचवलं होतं.”
-
त्यानंतर अभिनेत्रीने नवऱ्याचा फोटो पाहिला होता. दोघांचं फोनवर बोलणं झालं मग, त्यानंतर मृणाल आणि नीरज यांनी एकमेकांना भेटायचं ठरवलं होतं.
-
“भेट झाल्यावर आम्ही दोघं ६ महिने फोनवर कॉन्टॅक्टमध्ये होतो. तेव्हाच मी ठरवलं होतं की, हा मुलगा चांगला आहे आणि एकंदर मला तो आवडला होता.” असं मृणालने सांगितलं.
-
साध्या सोप्या पद्धतीने सगळ्या गोष्टी जुळून आल्यावर मृणाल दुसानिसने लग्न करण्याचा निर्णय घेतला. आता या जोडप्याला नुर्वी नावाची गोड मुलगी आहे. ( सर्व फोटो सौजन्य : मृणाल दुसानिस इन्स्टाग्राम )
हार्दिक पंड्याची पत्नी नताशाने टीम इंडिया भारतात येताच केलेली पोस्ट पाहून घटस्फोटाच्या चर्चांना उधाण; लिहिलं, “तेव्हा माझं रक्षण..”