-
स्टार प्रवाहची लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते’मध्ये सुरु होणार आहे महाराष्ट्राची सुगरण जोडी स्पर्धा.
-
अरुंधतीने या स्पर्धेत भाग घेत नवं आव्हान स्वीकारलं आहे.
-
अरुंधतीला या स्पर्धेत साथ देणार आहे मिहीर शर्मा.
-
अरुंधती आणि मिहीरला तोडीस तोड उत्तर देण्यासाठी अनिरुद्ध आणि संजनाने देखिल कंबर कसली आहे.
-
अरुंधतीची स्वयंपाकाची आवड सर्वांनाच माहित आहे.
-
या स्पर्धेत उतरण्याचं कारण फक्त स्वयंपाकाची आवड इतकंच नाही. तर अरुंधतीला आपलं घर म्हणजेच समृद्धी निवास वाचवायचं आहे.
-
अनिरुद्ध-संजनाने घरावर हक्क दाखवलाय. समृद्धी निवास पुन्हा मिळवण्यासाठी अरुंधतीला पैश्यांची गरज आहे आणि म्हणूनच ती महाराष्ट्राची सुगरण स्पर्धेत भाग घेणार आहे.
-
अरुंधतीला साथ देणारा मिहीर शर्मा उत्तम शेफ आहे. त्यामुळे ही जोडी या स्पर्धेत आपली छाप पाडण्यासाठी सज्ज आहेत.
-
मात्र अरुंधती जिंकू नये यासाठी अनिरुद्ध आणि संजना देखिल या स्पर्धेत उतरले आहेत.
-
त्यामुळे आई कुठे काय करते मालिकेतली ही स्पर्धा उत्कंठावर्धक होणार यात शंका नाही.
-
मालिकेत पहिल्यांदा अश्याप्रकारची स्पर्धा होत असल्यामुळे सर्वांनाच उत्सुकता आहे.
-
मालिकेची संपूर्ण टीम हा सीन करताना खूप धमाल करत आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : स्टार प्रवाह/इन्स्टाग्राम)

Video: चांगल्या कर्माचे फळ चांगलेच! काळ आला होता; पण…! गटाराचे उघडे झाकण लावायला गेला अन् चमत्कार झाला, दोन सेकंदांतच…