-
आईने मनात आणलं तर ती काय काय करु शकते याचं आदर्श उदाहरण म्हणजे स्टार प्रवाहवरील ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte!) ही मालिका आहे.
-
अरुंधतीचा (Arundhati) संघर्ष संपूर्ण महाराष्ट्राने अगदी जवळून अनुभवला आहे.
-
अनेक संकटं आली तरी अरुंधती कधीही डगमगली नाही.
-
प्रत्येक संकटाचा अरुंधतीने जिद्दीने सामना केला.
-
अरुंधतीच्या आयुष्यातला असाच एक महत्त्वाचा टप्पा ‘आई कुठे काय करते’ मालिकेत सध्या सुरु आहे.
-
देशमुख कुटुंबाचा अविभाज्य भाग अर्थातच समृद्धी बंगल्यावर अनिरुद्ध आणि संजनाने हक्क दाखवला आहे.
-
समृद्धी निवासाचा ताबा पुन्हा मिळवण्यासाठी अरुंधतीला पैश्यांची अत्यंत गरज होती.
-
त्यामुळेच अरुंधतीने ‘महाराष्ट्राची सुगरण जोडी’ (Maharashtrachi Sugran Jodi) या स्पर्धेत मिहीर शर्माबरोबर सहभाग घेतला.
-
अनेक नवनवे पदार्थ तिने या स्पर्धेत करुन दाखवले.
-
अनिरुद्ध आणि संजनासारखे प्रतिस्पर्धी असल्यावर विघ्न येणार हे काही नव्याने सांगायला नको.
-
अरुंधतीच्या वाटेत असंख्य अडथळे आणण्याचं काम अनिरुद्ध आणि संजनाने केले.
-
मात्र हे अडथळे पार करत अखेर अरुंधती महाराष्ट्राची सुगरण जोडी ही स्पर्धा जिंकणार आहे.
-
अंतिम फेरीत अरुंधती आणि मिहिरने मिळून फणासाचं सांदण, अळुचं फतफतं आणि केळफुलाची भाजी असे पारंपरिक पदार्थ बनवले आहेत.
-
अरुंधतीच्या आयुष्यातला हा विजय महाराष्ट्रातल्या अनेक स्त्रियांना संघर्षाचं नवं बळ देणारा ठरेल यात शंका नाही.
-
(सर्व फोटो सौजन्य : स्टार प्रवाह/इन्स्टाग्राम)

VIDEO: “जेव्हा नवरीला मनासारखा नवरा भेटतो” लग्नात नवरीचा भन्नाट डान्स; नवरदेव लाजून लाल तर सासूबाईंची रिअॅक्शनही बघाच