-
बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये अशी अनेक स्टार किड्स आहेत ज्यांनी चित्रपटांमध्ये करिअर करण्याचा प्रयत्न केला आहे. (Photo: Social Media)
-
परंतु अपयशामुळे त्यांनी स्वतःला इंडस्ट्रीपासून दूर केले आहे. (Photo: Social Media)
-
निर्माते वाशू भगनानी यांचा मुलगा जॅकी भगनानी याने कल किसने देखा या चित्रपटासाठी आयफा सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरस्कार जिंकला होता, परंतु या यशानंतर ‘F.A.L.T.U’ सह त्यांचे अनेक चित्रपट फ्लॉप ठरले आणि त्याने अभिनयापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आणि निर्माता म्हणून काम करण्यास सुरुवात केली. (Photo: Social Media)
-
राजेंद्र कुमार यांचा मुलगा कुमार गौरव हा अतिशय अप्रतिम देखणा दिसत होता आणि त्याने महेश भट्ट यांच्या ‘जनम’ या चित्रपटातून त्याच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. त्याला ‘लव्ह स्टोरी’ आणि ‘नाम’ या चित्रपटांमध्ये यश मिळाले, परंतु अखेरीस, त्याच्या फ्लॉप सिनेमांची संख्या त्याच्या हिट चित्रपटांपेक्षा जास्त झाली आणि त्याची कारकीर्द संपुष्टात आली. (Photo: Social Media)
-
दिग्गज अभिनेत्री तनुजा यांची मुलगी आणि काजोलची बहीण तनिषा मुखर्जी हिने बिग बॉस या रिॲलिटी टीव्ही शोमध्ये येण्यापूर्वी ‘नील एन निक्की’ आणि ‘वन टू श्री’ सारख्या चित्रपटांमध्ये काम केले होते हे चित्रपट फ्लॉप ठरले होते. (Photo: Social Media)
-
दिवंगत दिग्दर्शक यश चोप्रा यांचा मुलगा उदय चोप्रा याने २००० साली मोहब्बते या चित्रपटातून पदार्पण केले होते, पण शाहरुख खान आणि अमिताभ बच्चन यांच्यापुढे त्याची जादू काही चालू शकली नाही. याशिवाय सिंगल लीड चित्रपटांमध्येही तो काही खास दाखवू शकला नाही आणि प्रेक्षकांना प्रभावित करण्यात तो अपयशी ठरला. त्यामुळे तो चित्रपटांत अभिनय करण्यापासून लांब राहतो. (Photo: Social Media)
-
दिग्दर्शक संजय खान यांचा मुलगा झायेद खान याने २००३ मध्ये ‘चुरा लिया है तुमने’ मधून पदार्पण केले आणि २००४ मध्ये ‘मैं हूँ ना’ द्वारे आपली छाप सोडली. चांगली सुरुवात करूनही त्याची कारकीर्द यशस्वी होऊ शकली नाही. (Photo: Social Media)
-
ताहिर हुसैन यांचा मुलगा आणि आमिर खानचा धाकटा भाऊ फैजल खान याने २००० साली आलेल्या ‘मेला’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले, जो बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला. मात्र त्यानंतर तो एक-दोनच चित्रपटांमध्ये दिसला आणि आता तो इंडस्ट्रीपासून दूर आहे. (Photo: Social Media)
-
या यादीत अभिनेता आमिर खानचा भाचा इम्रान खान याच्या नावाचाही समावेश आहे, ‘ज्याने जाने तू या जाने ना’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये हिट पदार्पण केले, मात्र अनेक यशस्वी चित्रपटांनंतर त्याला फ्लॉप चित्रपटांचाही सामना करावा लागला आणि त्यामुळे तो हळूहळू बॉलिवूडपासून दुरावला. तरीही तो आता पुनरागमनाच्या तयारीत आहे. (Photo: Social Media)

Amol Kolhe: ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेच्या शेवटाबाबत अमोल कोल्हे यांचे धक्कादायक विधान; शरद पवारांच्या सूचनेबाबत म्हणाले…