-
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘घरोघरी मातीच्या चुली’ (Gharoghari Matichya Chuli) या मालिकेला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत आहे.
-
गेल्या कित्येक दिवसांपासून ज्या क्षणाची प्रेक्षक आतुरतेने वाट पहात होते तो क्षण अखेर आलाय.
-
रणदिवे कुटुंबातून काही दिवसांपूर्वी जानकी-ऋषिकेश घरातून बाहेर पडले त्या घरात या दोघांचा सन्मानपूर्वक गृहप्रवेश होणार आहे.
-
ढोल ताशाच्या गजरात आणि खास पाहुण्यांच्या उपस्थितीत जानकी-ऋषिकेश पुन्हा आपल्या घरी परतणार आहेत.
-
हा खास क्षण आणखी खास करण्यासाठी आदेश बांदेकर, सुचित्रा बांदेकर, सारिका नवाथे, अदिती देशपांडे आणि गिरीजा प्रभू यांनी हजेरी लावली आहे.
-
अभिनेते आदेश बांदेकर यांनी ऋषिकेशला मानाचा फेटा बांधून त्याचा गौरव केलाय.
-
तर अभिनेत्री गिरीजा प्रभू म्हणजेच ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेतील गौरीने ढोल वाजवून जानकी-ऋषिकेशचं स्वागत केलं आहे.
-
जानकी आणि ऋषिकेशच्या आयुष्यातला हा अत्यंत महत्त्वाचा क्षण आहे.
-
दोघंही या अभुतपूर्व स्वागताने भारावून गेले आहेत. अखेर विजय सत्याचाच होतो हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे.
-
अभिनेते आदेश बांदेकर यांच्यासाठी देखिल हा क्षण अत्यंत महत्त्वाचा आहे.
-
‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकेत पाहुण्या कलाकाराच्या रुपात त्यांची एण्ट्री होत असली तरी या मालिकेचा निर्माता म्हणून त्यांचं या मालिकेशी जिव्हाळ्याचं नातं आहे.
-
खूप वर्षांनंतर मालिकेत भूमिका साकारल्याचा वेगळा आनंद होतोय अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
-
(सर्व फोटो सौजन्य : स्टार प्रवाह/इन्स्टाग्राम)
पिंपरी-चिंचवड अन् भोवतालच्या पाच किलोमीटर परिसरातील शेकडो गृहप्रकल्प अडचणीत