-
‘चला हवा येऊ द्या’ व ‘फू बाई फू’ सारख्या कार्यक्रमांतून घराघरात पोहोचलेले विनोदी अभिनेते म्हणजे भाऊ कदम.
-
आपल्या विनोदी शैलीने भाऊ कदम यांनी प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं आहे
-
भाऊ कदम यांना तीन मुली असून संचिता, समृद्धी व मृण्मयी अशी त्यांची नावे आहेत.
-
‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत भाऊ कदम यांनी मुलींच्या लग्नात आपण जाणार नसल्याचे म्हटलं
-
याबद्दल ते म्हणाले, “एखाद्या मुलीचं जेव्हा लग्न होतं आणि ती सासरी जाते, तेव्हा त्या मुलीच्या बापाला काय वाटतं हे एका मुलीसाठी ठीक आहे, पण माझ्या तर तीन मुली आहेत.
-
यापुढे ते म्हणाले की, “मला तर वाटणारच नाही की, त्यांनी कधी जावं. त्यांनी कायम माझ्या जवळच राहावं असंच मला वाटतं. त्या कुठे गेल्या नाही पाहिजेत.”
-
“त्यांच्या लग्नात काय होईल माहीत नाही. त्यांच्या लग्नात मी एक तर नाटकाला तरी जाईन किंवा शूटिंगला तरी जाईन किंवा मी कुठे तरी बिझी (व्यग्र) आहे असं म्हणेन”.
-
“मग नंतर हवं तर त्यांच्या घरी (सासरी) जाईन. त्यांच्याबद्दल माझ्या डोक्यात कधी कधी असं येतं की, मी तो विचारच करत नाही. त्यामुळे मी मुलींच्या लग्नाचा विचारच करू शकत नाही”
-
विनोदी कार्यक्रमांबरोबरच ते ‘हाफ तिकीट’, ‘नशीबवान’, ‘सायकल’, ‘घे डबल’, ‘व्हीआयपी गाढव’, ‘पांडू’ अशा अनेक चित्रपटांतही झळकले आहेत. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
-
दरम्यान, अभिनेते भाऊ कदम यांनी आजवर केवळ आपल्या विनोदीच नाही तर गंभीर भूमिकांनीदेखील प्रेक्षकांचे लक्ष वेधलं आहे.

Gudi Padwa 2025 : गुढीपाडव्यानिमित्त प्रियजनांना WhatsApp, Instagram, Facebook वर पाठवा ‘या’ खास मराठमोळ्या शुभेच्छा; पोस्ट करा सुंदर HD Images