-
स्टार प्रवाह वाहिनीवर २८ एप्रिलपासून ‘कोण होतीस तू, काय झालीस तू’ (Kon Hotis Tu Kay Jhalis Tu) ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
-
या मालिकेतून प्रेक्षकांची लाडकी जोडी अर्थातच गिरीजा प्रभू (Girija Prabhu) आणि मंदार जाधव (Mandar Jadhav) नव्या रुपात दिसणार आहेत.
-
या मालिकेच्या कथानकाविषयी दिवसेंदिवस उत्कंठा वाढत चालली आहे.
-
या मालिकेत अभिनेत्री गिरीजा प्रभू कावेरी सावंत ही व्यक्तिरेखा साकारणार आहे.
-
मुलींना स्वरक्षण हे यायलाच हवं आणि त्यासाठी योग्य प्रशिक्षण घ्यायला हवं या मताची असणारी कावेरी गावातल्या इतर मुलींनाही स्वरक्षणाचे धडे देते.
-
या भूमिकेसाठी गिरीजा जवळपास महिन्याभरापासून लाठीकाठीचं प्रशिक्षण घेतेय.
-
काठी कशी पकडायीच इथपासून सुरु झालेला गिरीजाचा प्रवास आता काठीचा उपयोग करुन स्वरक्षण कसं करायचं इथपर्यंत येऊन पोहोचला आहे.
-
गिरीजाला नृत्यकला उत्तमरित्या अवगत आहेच.
-
या मालिकेच्या निमित्ताने गिरीजा लाठीकाठीही शिकली.
-
या अनुभवाविषयी सांगताना गिरीजा म्हणाली, लाठीकाठी हा महाराष्ट्राच्या मातीतला पारंपरिक खेळ आहे.
-
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून हा खेळ प्रचलित आहे.
-
स्वसंरक्षण हा मुख्य हेतू असलेला हा खेळ शारिरिक आणि मानसिक आरोग्य जपण्यासाठीही अत्यंत महत्त्वाचा आहे.
-
लाठीकाठीचं हे प्रशिक्षण फक्त मालिकेपुरतं नाही तर आयुष्यभर माझ्याबरोबर राहिल.
-
ही कला प्रत्येकाने शिकायला हवी असं यानिमित्ताने मी आवाहन करेन.
-
मी अवगत केलेली ही कला मालिकेतून प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : गिरीजा प्रभू/इन्स्टाग्राम)

Jagdeep Dhankhar: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची सर्वोच्च न्यायालयावर जाहीर टीका; म्हणाले, अनुच्छेद १४२ क्षेपणास्त्र बनलंय