-
बच्चन कुटुंब हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. मग ते चित्रपट असो वा त्यांचे वैयक्तिक आयुष्य. अमिताभ बच्चन यांच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळेदेखील अनेकदा चर्चांना उधाण येते. आता ऐश्वर्या राय व जया बच्चन पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत.
-
२००७ ला ‘फिल्मफेअर’ पुरस्कार सोहळ्यात जया बच्चन यांना ‘फिल्मफेअर लाइफटाइम अचिव्हमेंट’ पुरस्कार मिळाला होता.
-
हा पुरस्कार स्वीकारताना जया बच्चन म्हणाल्या होत्या, “याआधीही मला हा पुरस्कार देण्यात आला होता; मात्र मी तो स्वीकारला नाही. कारण- त्यावेळी मला वाटले होते की, ती वेळ योग्य नाही.”
-
“आता मी एका सुंदर व प्रेमळ मुलीची सासू होणार आहे, जिच्याकडे तिची मूल्ये आहेत आणि चेहऱ्यावर गोड हसू आहे.”
-
“मी तुझे बच्चन कुटुंबात स्वागत करते. माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे.”
-
जया बच्चन यांचे हे बोलणे ऐकून ऐश्वर्या रायला अश्रू अनावर झाले होते.
-
पुढे जया बच्चन म्हणाल्या होत्या, “मला वाटते की, हा पुरस्कार स्वीकारण्याची हीच योग्य वेळ आहे.”
-
ऐश्वर्या राय व अभिषेक बच्चन यांचे २००७ मध्ये लग्न झाले. त्यांना आराध्या ही मुलगी आहे.
-
आराध्या व ऐश्वर्या यांच्यातील बॉण्डिंगदेखील चाहत्यांचे लक्ष वेधून घेते. आराध्या ऐश्वर्याबरोबर अनेक कार्यक्रमांना हजेरी लावताना दिसते. ऐश्वर्या ‘पोन्नियिन सेल्वन २’मध्ये दिसली होती. आता आगामी काळात अभिनेत्री कोणत्या चित्रपटात प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (सर्व फोटो सौजन्य: ऐश्वर्या राय इन्स्टाग्राम)

Zapuk Zupuk: सूरज चव्हाणच्या ‘झापुक झुपूक’ने पहिल्या दिवशी कमावले ‘इतके’ लाख