-
पावसाळा सुरु झाला की बाजारात मक्याच्या कणसांची संख्या नेहमीपेक्षा जरा जास्तच दिसू लागते. हिरवट-पिवळस सालं असलेली मक्याची कणसं अनेकांची लक्ष वेधून घेतात. पावसाळ्यात तर पर्यटनस्थळी मक्याची कणसं विकाणारे हमखास सापडतात.
-
धो-धो कोसळणाऱ्या पावसात लिंबू-मीठ लावून भाजलेली कणसं खाणं हा अनेकांच्या आवडतीचा कार्यक्रम असतो. त्यामुळे खासकरुन पावसाळ्यात मक्याच्या कणसांना जास्त मागणी असते.
-
परंतु, सध्याच्या काळात बाराही महिने ही कणसं सहज उपलब्ध होत असतात. त्यामुळे अनेक गृहिणी त्यापासून विविध पदार्थ करताना दिसतात.
-
विशेष म्हणजे पावसाळ्यामध्ये ही कणसं खाण्याचे काही फायदे आहेत. त्यामुळे चला तर मग आज जाणून घेऊयात मक्याचे कणीस खाण्याचे काही फायदे.
-
१. मक्याचं कणीस खाल्ल्यामुळे दात मजबूत होण्यास मदत होते. त्यामुळे लहान मुलांसाठी आणि खासकरुन वृद्धांसाठी मक्याचं कणीस फायदेशीर आहे. विशेष म्हणजे आजकाल बाजारात या कणिसांचे दाणे सोलूनदेखील मिळतात.
-
२. मक्यामध्ये पित्त आणि वात कमी करण्याचे गुणधर्म असल्याचं म्हटलं जातं. त्यामुळे उकळत्या पाण्यात हळद आणि मीठ घालून मक्याचे दाणे उकडून खाल्ल्यास त्याचाही शरीराला फायदा होतो.
-
३. मका हे एक धान्य असून त्याकडे अँटी-ऑक्सीडेंट म्हणूनही पाहिलं जातं. त्यामुळे त्याच्या सेवनाने जवळपास शरीरातील अँटी-ऑक्सीडेंट्सचे प्रमाण ५० टक्क्यांनी वाढते.
-
४. मक्याच्या सेवनामुळे वाढत्या वयाच्या खूणा कमी होतात.
-
५. मक्यात असलेल्या फॉलिक अॅसिडमुळे कर्करोगाचा धोका कमी असतो.
-
६. मक्यामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉलची मात्रा नियंत्रणात राहते.
-
७. मक्याच्या पिठापासून तयार केलेली पोळीदेखील शरीरासाठी फायदेशीर आहे.

५ मार्चनंतर पैसाच पैसा! गजकेसरी राजयोगामुळे ‘या’ तीन राशींना मिळेल अपार श्रीमंती, होईल अचानक धनलाभ