-
सोलो ट्रॅव्हल म्हणजेच एकट्याने प्रवास करणे हा एक अद्भुत अनुभव आहे. तसेच, हे खूप साहसी आहे. (Photo : Freepik)
-
सोलो ट्रिपदरम्यान, तुम्ही केवळ तुमच्या स्वतःच्या कंपनीचा आनंद घेत नाही तर तुम्हाला नवीन लोकांना भेटण्याची संधी देखील मिळते. (Photo : Pexels)
-
आयुष्यात एकदातरी एकट्याने प्रवास करायला हवा. (Photo : Pexels)
-
यादरम्यान तुम्हाला अनेक नवीन गोष्टी शिकायला मिळतात. सोबतच यामुळे जीवनात अनेक सकारात्मक बदल घडवून आणण्यास मदत होते. (Photo : Freepik)
-
आज आपण भारतातील अशी काही ठिकाणं जाणून घेणार आहोत जिथे एकट्याने प्रवास करण्याचा खूपच सुखद अनुभव तुम्हाला मिळू शकतो. (Photo : Pexels)
-
बीर बिलिंग : जर तुम्हाला पॅराग्लायडिंग करायला आवडत असेल तर हे ठिकाण तुमच्यासाठी योग्य आहे. हिमाचल प्रदेशातील हे एक छोटेसे गाव आहे.
-
हे सर्वोत्तम पॅराग्लायडिंग साइट म्हणून ओळखले जाते. तुमच्या साहसी सोलो ट्रिपसाठी हे योग्य ठिकाण आहे.
-
वाराणसी : वाराणसीला बनारस आणि काशी असेही म्हणतात. तुम्ही येथे केवळ शांतता अनुभवू शकत नाही तर अनेक स्वादिष्ट पदार्थांचा आस्वाद देखील घेऊ शकता. आनंददायी अनुभवासाठी वाराणसीला जरूर भेट द्या.
-
उदयपूर : राजस्थानमधील उदयपूर हे सुंदर अरवली डोंगरांनी वेढलेले आहे. यात अनेक मोहक तलाव आहेत. भव्य वास्तुकला, सुंदर मंदिरे आणि नैसर्गिक सौंदर्य मंत्रमुग्ध करणारे आहे.
-
तुम्ही येथे बोटिंगचा आनंद घेऊ शकता, भव्य प्राचीन किल्ले आणि बाजारपेठांमध्ये खरेदी करू शकता.
-
मनाली : मनाली येथे दरवर्षी मोठ्या संख्येने पर्यटक येतात. हे एक वंडरलँड वाटते. निसर्ग प्रेमी, साहसी प्रेमी आणि ट्रेकर्ससाठी योग्य हे एक उत्तम ठिकाण आहे.
-
येथे तुम्ही आइस स्केटिंग, पॅराग्लायडिंग, स्कीइंग आणि इतर अनेक साहसी अॅक्टिव्हिटीजचा आनंद घेऊ शकता.
-
जयपूर : जयपूरला पिंक सिटी म्हणूनही ओळखले जाते. या शहराला समृद्ध वारसा लाभलेला असून येथे अनेक स्मारके आणि संरचना आहेत. या सर्वांशी एक आकर्षक कथा जोडलेली आहे.
-
जर तुम्हाला इतिहासात रस असेल तर तुम्ही जयपूरला अवश्य भेट द्या. तसेच, तुम्हाला रॉयल अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही येथे एकट्याने सहलीला नक्कीच जावे.
-
ऋषिकेश : हरिद्वारपासून जवळ असलेले ऋषिकेश हे एकट्याने प्रवासासाठी उत्तम ठिकाण आहे.
-
तुम्ही येथे रिव्हर राफ्टिंग, बंजी जंपिंग, कॅम्पिंग आणि इतर अनेक साहसी अॅक्टिव्हिटीजचा आनंद घेऊ शकता. ऋषिकेश हे जगाची योग राजधानी म्हणूनही ओळखले जाते.
-
कसोल : कसोल हे हिमाचल प्रदेशातील पार्वती नदीच्या काठावर वसलेले एक छोटेसे गाव आहे. हे खूप शांत ठिकाण आहे. आपण येथे सुंदर दृश्यांचा आनंद घेऊ शकता. (सर्व फोटो : ट्विटर)

बापरे! मुंबई लोकलच्या महिला डब्यात धक्कादायक प्रकार; पोलीस असूनही घडलं भयंकर, VIDEO पाहून धडकी भरेल