-
अनेक अहवलांमध्ये दिलेल्या माहितीनुसार, भारतात दर मिनिटाला एका व्यक्तीचा स्ट्रोकमुळे मृत्यू होतो. खराब जीवनशैली आणि काही वाईट सवयींमुळे ही समस्या उद्भवू शकते.
-
स्ट्रोक म्हणजेच पक्षाघात ही आज एक सामान्य समस्या बनली आहे. मोठ्या संख्येने तरुण याच्या विळख्यात येत आहेत.
-
वैद्यकीय भाषेत, जेव्हा मेंदूला रक्तपुरवठा खंडित होतो, तेव्हा ऑक्सिजनची कमतरता निर्माण होते.
-
या स्थितीत मेंदूचे नुकसान किंवा पक्षाघाताचा धोका असतो. आज आपण स्ट्रोकचा धोका वाढण्यासाठी कारणीभूत ठरणाऱ्या वाईट जीवनशैलीच्या सवयींबद्दल जाणून घेऊया.
-
चुकीचे खानपान किंवा आहारातील पोषक तत्त्वांची कमतरता यांचा परिणाम शरीरावर अनेक प्रकारे दिसून येतो, त्यापैकी एक म्हणजे पक्षाघाताची घटना.
-
सॅच्युरेटेड फॅट, मीठ, ट्रान्स फॅट आणि उच्च कोलेस्ट्रॉलचे प्रमाण यामुळे शरीरातील रक्तप्रवाह व्यवस्थेत अडथळा निर्माण होतो. अशा परिस्थितीत आहाराची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.
-
मद्यपान हे एक असे व्यसन आहे जे व्यक्तीला हळूहळू मृत्यूच्या दाढेत ढकलू शकते.
-
अतिप्रमाणात केलेल्या मद्यपानामुळे शरीरातील अनेक महत्त्वाच्या अवयवांचे नुकसान होते. तसेच, यामुळे पक्षाघाताचा धोकाही कायम राहतो.
-
शारीरिक क्रियाशील नसल्यामुळे शरीर अनेक गंभीर आजारांचे घर बनू शकते. त्यामुळेच नियमित व्यायाम न करणाऱ्यांनी व्यायाम करण्याची सवय लावून स्वतःला फिट ठेवावे.
-
भारतात तंबाखूशी संबंधित वस्तूंचे उत्पादन आणि सेवन मोठ्या प्रमाणावर केले जाते. तंबाखू हे केवळ पक्षाघाताचेच नाही तर कर्करोगाचेही प्रमुख कारण आहे.
-
तंबाखूमुळे रक्तवाहिन्यांचे नुकसान होते आणि अशावेळी शरीरात रक्तदाबाची समस्या वाढते.
-
येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता कृपया तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. (सर्व फोटो : Pexels/Freepik)
IND vs PAK: “माझी विकेटनंतर सेलिब्रेट करण्याची…”, गिलला बोल्ड केल्यानंतर भुवई उंचावणाऱ्या पाकिस्तानच्या अबरारचं मोठं वक्तव्य; सामन्यानंतर काय म्हणाला?